पुणे- “ सर्वसामान्यांचे गुणवत्तापूर्ण जीवन, जागतिक अर्थव्यवस्था व विकासाच्या सर्व गोष्टीमध्ये सातत्य ठेवणे या तीन महत्वपूर्ण मुद्यांच्या आधारे पुणे शहर हे देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट शहर म्हणून उद्यास येईल,” असा दावा पुणे महानगर पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी येथे केला.
एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेतर्फे आयोजित जागतिक पातळीवरील दोन दिवसीय उद्योजकता संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केरळ राज्याचे प्रिन्सीपल अकांउंटन्ट जनरल डॉ. अमर पटनाईक, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंंत्रालयाचे सह सचिव डॉ. श्रवण कुमार, एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे सल्लागार श्वेता शालिनी, एमएसआरएलएमच्या सीईओ श्रीमती आर. विमला, आयसीटीच्या संचालिका प्रा. सुनिता मंगेश कराड, इंट्राप्रेनियर कॅफेचे संस्थापक डॉ. निखील अग्रवाल, डॉ. रूची अग्रवाल व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुनिल राय सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कुणाल कुमार म्हणाले “ स्मार्ट सिटीमध्ये लोकमाहिती व्यवस्था, तक्रार निवारण व्यवस्था चांगली असते, सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात. येथे नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात ठेवले जाते. कचर्यपापासून उर्जा व इंधन बनविल्या जाते. वीज व पाणी पुरवठ्यासाठी स्मार्ट मीटर्स असते. विजेचा वापर कार्यक्षम असतो. वाहतूक नियोजन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाते. त्यामुळे स्मार्ट सिटीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. भविष्यकाळ हा तंत्रज्ञाने युक्त असेल. अशा वेळेस युवा उद्योजकांनी तंत्रज्ञानाची कास धरावी. सामाजिक समस्या जाणून नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून समाज उन्नतीचे नव तंत्र विकसीत करावे.”
डॉ. अमर पटनाईक म्हणाले “कृषी क्षेत्र, प्राथमिक आरोग्य सुविधा व प्राथमिक शिक्षणा सारख्या महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी उद्योजकांनी समोर यावे. प्रत्येक राज्यातील समस्या वेगवेगळ्या असतात त्याचा अभ्यास करून त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. कृषी क्षेत्रात टेक्नोपार्ट व इंटरनेट ऑफ थींकचा वापर मोठ्या प्रमाणत केल्यावर राज्यांच्या आर्थिक व्यवस्थेत मोठा बदल दिसून येईल. केरळ येथील कृषी क्षेत्रात याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कुठल्याही क्षेत्रात कार्य करतांना नवी कल्पना हे प्रगतीचे लक्षण आहे.”
प्रा.डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले “ नव निर्मितीसाठी उद्योजक महत्वाची भूमिका पार पाडतात. या विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी झेप घेऊन विद्यार्थांचे वेगळे व्यक्तिमत्व निर्माण करीत आहे. नव उद्योजकांनी सामाजिक व राजकीय आव्हाने स्वीकारून कार्याची सुरूवात करावी. आम्हाला भारतीय माइक्रोसॉफ्ट व गुगल सारख्या तंत्रज्ञानाची निर्मिती करावयाची आहे. त्याच प्रमाणे सुंदर पिचाई व सत्या नडेल सारख्या बुद्धीमत्तेची गरज मोठ्या प्रमाणत आहे. त्या दिशेने शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण कार्य करावयाचे आहे. त्यासाठी उद्योजक व शिक्षण संस्थामध्ये भागीदारी होणे गरजेचे आहे.”
डॉ. श्रवण कुमार म्हणाले “ सध्या भारतात सांस्कृतिक उद्योजकाची गरज भासत आहे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ असून वसुधैव कुटुंबकम असल्यामुळे तिला जागतिक स्तरावर पोहचविण्याचे कार्य मोठ्या प्रमणात होणे गरजेचे आहे. संस्कृतीचे आदान-प्रदान करण्याचे एक सशक्त माध्यम चित्रपट आहे. त्या माध्यमातून मुलांमध्ये सृजनात्मक कल्पनांना वाव मिळण्यास मदत होते.”
श्रीमती आर.विमला म्हणाल्या“ स्वयंसेवक संगठनाच्या माध्यमातून ग्रामिण क्षेत्रात कार्य करतांना बर्याच अडचणी येतात. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील महिलांचे सबलीकरण करणे, आर्थिक दृष्या मजबूत बनविण्याचे कार्य करीत आहोत. त्यामुळे ग्रामिण क्षेत्रातील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक प्रगती होण्यास मदत मिळते.”
श्वेता शालिनी म्हणाल्या“ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञानाची शक्ती ओळखून राज्यात त्याचा वापर मोठ्या प्रमाणत करीत आहेत. राज्यातील खेडेगावांना दत्तक घेऊन तिथे तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रणावर केला जात आहे. त्यामुळेच ग्रामिण क्षेत्रातील लोकांचे जीवन प्रकाशमय झाले आहे. पुण्यात सर्वाधिक स्टार्टअप झाले आहे. तसेच, हे संशोधनाचे केंद्र म्हणून उद्यास आले आहे.”
डॉ. निखील अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत म्हणाले, या दोन दिवसीय सम्मेलनात संपूर्ण जगभरातील उद्योजक सहभागी झाले आहेत. भविष्यकाळात नव उद्योजकांना अॅप आणि वेब या दोन गोष्टींवर अधिक जोर दयावा लागणार आहे. दोन दिवसीय कार्यक्रमात नव-नवी कल्पना, संशोधन आणि विचारांची आदन-प्रदान मोठ्या प्रमाणात होणार आहे.
डॉ. सुनील राय यांनी स्वागतपर भाषण केले व आभार मानले.
अर्चना साह व श्रृती पंडित यांनी सूत्रसंचालन केले.