पुणे- मौसम आज भी बडा बेईमान है ,पर पिऊंगा नही.. असे ख्यातनाम अभिनेता धर्मेंद्र यांनी म्हटले आहे , होय यूएसके फौन्डेशन च्या वतीने उर्जा अवार्ड मिळाल्यावर १ मिनिटात त्यांनी आपली भावना मीडियापुढे बोलताना व्यक्त केली . धर्मेंद्र यांची तब्बेत काही दिवसांपासून थोडी नाजूक आहे. स्टार च्या आयुष्यातले असे क्षण जणू सर्वानांच नको वाटतात . कायम तारुण्यात बहारावे ,असे सर्वानांच वाटते . पण आज येथे धर्मेंद्र आले तेव्हा त्यांना एका मदतनिसाची गरज होती . याची त्यांन खंत होती , जी त्यांनी बोलून देखील दाखविली . माणूस किती हि मोठ्ठा स्टार झाला तरी त्याने माणुसकी विसरता कामा नये .. कोमान मोठ्ठा झाला नाही तरी ज्याच्याकडे माणुसकी आहे तोच खरा स्टार असतो असे हि ते म्हणाले .. या वयात धर्मेंद्र यांनी व्यक्त केलेल्या भावना अनेक सिने सामिक्षकांना खूप महत्वाच्या वाटतात .. पहा आणि ऐका .. धरमपाजींचे हे शव्द …