पर्यावरण संवर्धनासाठी ३९०० किमीच्या सायकल प्रवासाचा आरंभ
पुणे-पर्यावरण हेच जीवन असा संदेश देण्यासाठी भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी आघाडीच्या वतीने शाहू महाविद्यालय येथील दोन विद्यार्थी कु. सायली महाराव व अभिजित गवळी यांनी अरुणाचल प्रदेश व गुजरातव परत पुणे असा ३९०० कि. मी. चा सायकल प्रवास सुरु करताना आज सारसबाग येथील तळ्यातील महागणपतीचे दर्शन घेऊन आरंभ केला.
या अभियान व संपूर्ण सायकल प्रवासात ते प्लास्टिक हटाव या प्रबोधन अंतर्गत मोहिमेत प्लास्टिक मुळे होणारे प्रदूषण, मानवास होणारे विविध अपाय, व अनेक विविध प्रकारच्या नुकसानीची माहितीची आपल्या मोहीमेत प्रबोधन करणार आहेत
विशेष म्हणजे या मोहीमेत अरुणाचल प्रदेश व गुजरातव परत पुणे असा ३९०० कि. मी. चा प्रवास सायकलवर करणार आहेत
यावेळी राष्ट्रीय ध्वज तिरंगा झेंडा फडकावून त्यांना अभियान यशस्वी होण्यासाठी निरोप व शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी पुणे महानगरपालिका चे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष हरीश परदेशी नगरसेवक दिलीप वेडे पाटील लोकसभा चे विस्तरारक योगेश बाचल ,किरण वैष्णव, शेखर वाघ प्रशांत अडसूळ ,दिव्या लोळगे, लीना देशमुख सोनाली वैष्णव व विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे संयोजक
गणेश शेरला ,सरचिटणिस भा ज पा झोपडपट्टी आघाडी यांनी केले