पुणे- देशातील विरोधक संसदेचे कामकाज होवू देत नाहीत म्हणून एक दिवसीय आपल्या सहकाऱ्यांसह लाक्षणिक उपोषण करणारे पुण्याचे खासदार अनिल शिरोळे हे कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर का मौन पाळून आहेत . आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी ,का ते आपल्या नेतृत्वाखाली शहर भाजपचे पुन्हा एकदा उपोषण घडवून आणणार आहेत काय ? असे सवाल करत आता शिरोळे यांच्यावर टीका होवू लागली आहे .
कठुआ बलात्कार प्रकरणी फक्त राजकीय ,सामाजिक क्षेत्र आणि बॉलिवूडच नव्हे, तर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. माणुसकीच्या दृष्टीनेही विचार करायचा झाला तर प्रत्येक ठिकाणाहून या घटनेविषयी चीड आणि संताप पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी याबद्दल लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत . जर या घटनेचे राजकारणच करायचे नाही तर या प्रकरणी सरकारने काय कारवाई केली ? या पाशवी घटनेचा साधा निषेध करणे तर ठीक नाहीच पण सत्ताधारी म्हणून आपण काय करीत आहोत ? हे सांगण्याची तसदी देखील खासदारांनी घेतली नाही . कॉंग्रेसने लाक्षणिक उपोषण केले कि आपण हि करायचे या राजकारणातच केवळ त्यांना रस आहे काय ?महिलांच्या, मुलींच्या सुरक्षेबाबत , हक्काबाबत पुण्याच्या खासदारांनी जागृत राहणे गरजेचे नाही काय ? असे हि सवाल या निमित्ताने आता राजकीय वर्तुळात झडू लागले आहेत . दरम्यान पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि संवेदनशील अशा शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराने या घटनेबाबत दखल घेतली किंवा नाही हे सुद्धा जनते पर्यंत पोहोचलेले नाही .
न्यूयॉर्क टाईम्स च्या संपादकीय मधून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका झाली . युनो मध्ये या पाशवी घटनेबद्दल चिंता व्यक्त झाली आणि पुण्याच्या खासदारांना का मौन व्याधीने पछाडले आहे ते समजत नसल्याचे लोक आता बोलू लागले आहेत .