Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

झी युवावर “प्रेम हे” या मालिकेची पहिली गोष्ट आहे “रुपेरी वाळूत “

Date:

प्रेमाला भाषा नसते , जात नसते , धर्म नसतो … असते ती फक्त भावना …. आणि या एका भावनेच्या भोवती प्रेमी युगलांचं अख्ख आयुष्य एकवटलेलं असतं.  झी युवावर  २७ फेब्रुवारीपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता एक नवी कोरी प्रेमाच्या विविध गोष्टी सांगणारी मालिका सुरु होत आहे . “प्रेम हे ” प्रेमात असलेल्या , आणि नसलेल्या प्रत्येकासाठी हि मालिका आहे .प्रेम करणे सोपे आहे पण ते निभावणे तेवढेच कठीण असते, असे म्हटले जाते. तरीही प्रेम करणारे प्रेम करतच राहतात.  प्रेम हे केवळ आपल्या जोडीदाराला मिळवणं नसत . त्या व्यक्ती साठी मनाला पटेल आणि नातं टिकवेल असे सर्व करण्याची तयारी असते आणि कुठच्याही कारणाने आपल्या आवडत्या व्यक्तीला गमवावं लागलं तर मात्र ही गोष्ट आपल्यासाठी  खूप कष्टप्रद आणि त्रासदायक ठरू शकते. प्रेमाच्या अश्या असंख्य भावना अनेकांच्या मनात धुमसत असतात. शहरातील लोक बऱ्याच अंशी बोलून मोकळी होतात पण ग्रामीण  भागात आजही अनेकांच्या प्रेमकहाण्या या अव्यक्तच राहिल्या आहेत . याच विषयाला धरून “प्रेम हे” या मालिकेची पहिली गोष्ट आहे “रुपेरी वाळूत ”  एका गावात राहणारे सुनील आणि राधिका  ( वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान ) , एकमेकांवर प्रेम तर करतात पण एकमेंकाना व्यक्त होणं तितकसं सोपं नसतं. मग त्यांना जोडणारी आणि त्यांच्यातील प्रेम फुलवणारी गोष्ट म्हणजे एक गाणं “रुपेरी वाळूत …”  आणि ह्या गाण्याबरोबर त्यांचं फुलत जाणार पण अव्यक्त प्रेम ..  आणि  याचबरोबर त्यांच्या प्रेमाच्या आडवं येणार , घर समाज , गाव आणि लग्न ….प्रेम म्हणजे उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विनलेलं नातं असत  .. जे मनात असतं ते शब्दात मांडता येत नाही … अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तीला केवळ पाहण्यात जीवनाचा अर्थ लागतो पण ती व्यक्ती आपली व्हावी हि भावना मनमोकळेपणाने तिलाही न सांगू शकणारे अनेकजण आपल्याला अनेक ग्रामीण भागात सापडतात . दोन जिवांचे मधुर मीलन म्हणजेच  प्रेम असतं. . पण त्यासाठी त्या दोघांनीही प्रयत्न करण तेवढच महत्वाच असत. अशी अनेक तरुण असतात कि जे आपल्याला काय आवडतं त्याही पेक्षा तिला काय आवडतं हे महत्वाचं मानतात आणि तिच्या नकळत ,  ते तिला मिळवून देण्यासाठी धडपड करतात. हता भावनेतही  प्रेमचं असतं.

झी युवावरील “प्रेम हे ” या मालिकेतील पहिली गोष्ट आहे “रुपेरी वाळूत ” .  ग्रामीण भागातील अव्यक्त प्रेम भावना अधोरेखित करणारी हि गोष्ट असून यात वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. या भागाचे दिगदर्शन  संतोष मांजरेकर यांनी केले असून सचिन तडाखे यांनी हि कथा लिहिली आहे .  समीर पेणकर यांचे सवांद आणि पटकथा आहे . “प्रेम हे” या मालिकेचे संगीत निलेश मोहरीर यांनी केले असून हृषीकेश रानडे आणि केतकी माटेगांवकर यांनी शीर्षक गीत गायले आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...