भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटलांचा सवाल
पुणे- कोरोनाच्या संकट काळात ६ महिन्याहून अधिक काल ज्यांचे व्यवसाय बंद राहिले, नौकऱ्या गेल्या हातावर पोट असणाऱ्या अशा गोरगरीबांसाठी राज्य सरकारने कोणते पैकेज जाहीर केले ? कोणती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविली ? असा सवाल आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे केला. निव्वळ केंद्राकडे बोट दाखविण्याचा उद्योग या सरकारने केला असाही आरोप त्यांनी येथे केला . भाजपचे नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी वेडेपाटील यांच्या प्रभागातील ८०० रिक्षाचालकांना व्यवसाय करताना दक्षता म्हणून प्रावासी आणि रिक्षाचालक यांच्या दरम्यान राहील असा संरक्षक प्लास्टिक च्या पडद्या चे आणि मास्क चे मोफत वाटप केले . याचवेळी ज्या महिला कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी योगदान दिले अशा १४ महिला कार्यकर्त्यांचा आ. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे, किरण दगडे पा. आणि भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आ. पाटील पुढे म्हणाले ,’ लोकांना चरितार्थासाठी ,व्यवसायासाठी उपयुक्त ठरतील असे कार्यक्रम घ्यावेत अशा सूचना आपण भाजपच्या आमच्या नगरसेवकांना केल्या आहेत .त्या दृष्टीने वेडेपाटील यांनी सुरु ठेवलेली वाटचाल निश्चित कोतुकास्पद आहे. पण एखादी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याकडून होणार्या मदतीला मर्यादा येतात. सरकारने नाभिक समाजाचे असतील ,रिक्षाचालक असतील, किंवा मोलमजुरी करणाऱ्या महिला असतील अशा हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांचे या ६ महिन्यात बुडालेले रोजगार पाहता त्यांना स्वतः हून पुढे येऊन मदतीचा हाथ द्यायला हवा होता . तो काही दिल्याचे दिसत नाही. वेडेपाटील यावेळी म्हणाले याच पुण्यात मी अडीच वर्षे रिक्षा चालविली . रिक्षाचालकांचे प्रश्न आणि समस्या मी जाणून आहे . असंख्य प्रवासी आणि खुद्द रिक्षावाला या दोहोंच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी म्हणून आपण संरक्श पडदा आणि मास्क चे मोफत वाटप करत आहे. यापूर्वीही आपण असंख्य स्तरावर कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात दिला आज माझ्या या कामाचे कौतुक खुद्द नेत्यांनी केल्याने मला आणखी प्रेरणा मिळाली आहे.