Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्याच्या राजकारणात खंबीर नेतृत्वाची कमतरता ,पोकळी भरून काढण्याची गरज -राज्य मंत्री विजय शिवतारे

Date:

यशवंतराव चव्हाण, शंतनूराव किर्लोस्कर , सुनील दत्त, नर्गीस दत्त पुरस्काराचे वितरण
पुणे :
‘ पुण्याच्या राजकारणात पोकळी आहे . ती भरून काढण्याची इच्छा आहे ,मला लक्ष घालायचे आहे,पण आमच्या  पक्षाचे धोरण वेगळे आहे ‘ असे सांगत जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी  आज पुण्याच्या अनेक विकासवषयक मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले .
कृष्णकांत कुदळे पतसंस्था, नर्गिस दत्त महिला पतसंस्था, कृष्णकांत कुदळे फाऊंडेशन यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण, शंतनूराव किर्लोस्कर , सुनील दत्त, नर्गीस दत्त पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी माजी वनमंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या हस्ते ,जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत  करण्यात आले.
एसएम जोशी सभागृह येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे  बोलत होते. ७४ व्या वाढदिवसानिमित्त कृष्णकांत कुदळे यांचा सत्कार डॉ.पतंगराव कदम यांच्या हस्ते जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
मामासाहेब खांडगे पतसंस्थेला यशवंतराव चव्हाण पुरस्कार देण्यात आला. गणेश खांडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार भरत फाटक यांना देण्यात आला. सुनील दत्त पुरस्कार दिव्यांगासाठी कार्यरत रामदास म्हात्रे यांना तर नर्गिस दत्त पुरस्कार उदयोन्मुख कलाकार प्रियांका बर्वे यांना देण्यात आला.
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सौ. मंगल कुदळे, डॉ .  सतीश देसाई , अंकुश काकडे , मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे , रवी चौधरी उपस्थित होते
 ‘ कृष्णकांत कुदळे हे मनमिळावू व्यक्तिमत्व असून संस्थात्मक काम त्यांनी केले, मात्र राजकीय कामातून कसलीही अपेक्षा ठेवली नाही. मनाला समाधान हाच निकष ठेऊन ते कार्यरत राहिले’ , असे उदगार डॉ.पतंगराव कदम यांनी काढले
जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे म्हणाले ,’६० वर्षात विकास झाला नव्हता .अनेक घराण्यांनी सत्ता बळकावून ठेवली होती . जनतेला बदल हवा होताच . दुष्काळाचे चित्र बदलत नव्हते . मात्र ,आता जलयुक्त शिवार मुळे तुरीचे विक्रमी उत्पादन होईपर्यंत मजल गाठली आहे . जलयुक्त शिवार ही माझीच संकल्पना आहे . गुंजवणी धरण दीड वर्षात पूर्ण करून आम्ही पुरस्कार मिळवला .पुरंदरचा पाणी प्रश्न सोडवत आणला . पंतप्रधान , मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत ,आणि आशावादी चित्र तयार होत आहे . मात्र ,महाराष्ट्रात योगी स्टाईल काम करून चालणार नाही .
पुण्याच्या प्रश्नाबद्दल बोलताना शिवतारे म्हणाले ,’पुण्याचे पाणी चोरून वापरले जाते . त्यासाठी पुणेकरांच्या पाणी वापराला दोष देण्यात अर्थ नाही . तरीही कमीत कमी पाणी वापर करून पोशिंद्याला ते देण्याची गरज आहे . आपण अधिकृत टॅप देऊन दीडपट रकमेने मीटर देऊन आंबेगाव सारख्या भागात प्रश्न मार्गी लावला . त्या आधी तिथे पैसे घेऊन अनधिकृत पाणी कनेक्शन जोडले जात होते . महापौर मुक्ता टिळक यांचा विरोध असतानाही मी अधिकृत टॅप दिले
उरळीच्या कचरा डेपोमुळे पुढील ३० वर्षे त्या परिसरातील पाणी पिता येणार नाही इतके दूषित झाले आहे . ३० लाख मेट्रिक टन कचरा एकाच ठिकाणी डम्प करण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण आहे . आम्ही आंदोलन करून कॅपिंग आणि पाणी मंजूर करून घेतले . पण ,कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मित्तीसारखे प्रकल्प परदेशी कंपन्या करायला तयार असूनही हे प्रकल्प आपण घेतले नाहीत .
शिवसेना फक्त मुंबईत लक्ष घालते ,पुण्याकडे त्यांचे लक्ष नाही ,अशी चर्चा होते ,म्हणून मी उद्धव ठाकरे याना निवडणुकीपूर्वी पुण्यातील  २०० मान्यवरांबरोबर  संवाद कार्यक्रम घेण्याची विनंती केली होती . मी स्वतः पुणे निवडणुकीत  लक्ष घालण्यास तयार होतो . मात्र ,पक्षाचे या बाबत धोरण ठरले नाही . पुण्यात आजही कणखर ,खंबीर नेतृत्वाची पोकळी आहे .आणि ती भरून काढली पाहिजे .
राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.प्रा . दादा शिंदे यांनी आभार मानले .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा...

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल...

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी...

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात पुणे – पुणे...