पुणे -‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया यांना राज्याचे अन्नपुरवठा मंत्रीतथा पुण्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा ‘पर्यावरण विभाग’ आणि
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या वतीने आयोजीत केलेल्या‘पर्यावरणाची वारी। पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी हा पुरस्कार देण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर श्री. प्रशांत जगताप, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे सदस्य सचिव श्री. पुंडलिक मिराशी व श्री. संजय भुस्कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री श्री. गिरीश बापट म्हणाले, ‘‘समाजात वारसा सांगण्यासाठी आणि तो चालविण्यासाठी इतर क्षेत्रात जेवढी चढाओढ चालते, तेवढी चढाओढ सामाजिक कार्याचा वारसा घेताना आणि तो चालविताना दिसत नाहीत. मात्र रवींद्र धारिया हे आपला व्यवसाय सांभाळत वनराई संस्थेच्या माध्यामातून पर्यावरण संवर्धनाचा वारसा कार्यक्षमपणे चालवित आहेत, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.’’ यावेळी त्यांनी वनराईचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.पुरस्काराला उत्तर देताना श्री. धारिया म्हणाले, ‘‘वनराईचे शेकडोकार्यकर्ते महाराष्ट्रातील विविध गावांत कार्यरत असल्यामुळे वनराई ही पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात अग्रेसर संस्था बनली आहे. त्यामुळे हा सन्मान खरे तर ‘वनराई’च्या कार्यकर्त्यांचा आणि संस्था कार्यरत असलेल्या गावांतील ग्रामस्थांचाही आहे.’’यावेळी श्री. संजय भुस्कुटे यांनी ‘जलसंवर्धन पंचायत- एक
लोकचळवळ’ या कार्यक्रमाची माहिती दिली. दुष्काळ निर्मूलनाचा विकेंद्रितआणि एकात्मिक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून गावोगावच्या तरुण पिढीला सक्रिय करण्यासाठी ‘वनराई’, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘झी- 24 तास’ यांच्या संयुक्त सहकार्याने ‘जलसंवर्धन पंचायत – एक लोकचळवळ’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात महाराष्ट्रातील 100 गावांपासून करण्यात येत असून, दरवर्षी टप्प्या-टप्प्याने याची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.