‘एआयटी’मध्ये उभारणार विद्यापीठाचे संशोधन केंद्र

Date:

डॉ. नितीन करमळकर; डॉ. रमण गंगाखेडकर यांना ‘एआयटी’तर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे: “नवीन शिक्षण धोरणात संशोधन, इनोव्हेशन, सर्वांगीण शिक्षण, आंतर-बहुशाखीय शिक्षण आदींचा अंतर्भाव आहे. संशोधनाधारित आणि चौकटीबाहेरचे, तसेच विद्यार्थ्याला आवडीचे शिक्षण घेण्याला प्रोत्साहन मिळावे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे असलेला कल पाहता लवकरच येथे विद्यापीठाच्या सहयोगाने संशोधन केंद्र उभारण्यात येईल. त्यातून मुलांच्या संशोधनाला चालना मिळेल व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) २७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. करमळकर बोलत होते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-आयसीएमआर) साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर ‘एम तत्व’ आणि सिम्बो.एआय’ कंपनीचे सहसंस्थापक बलजीत सिंग व प्रवीण प्रकाश यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. गंगाखेडकर, सदर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, लेफ्टनंट जनरल डी. एस. अहुजा (एव्हीएसएम) ऑनलाईन सहभागी झाले होते. तर ‘एआयटी’च्या कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील आदी उपस्थित होते. डॉ. गंगाखेडकर यांच्या वतीने डॉ. बी. पी. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहमीच संशोधनाला प्राधान्य देत आहे. त्याचाच भाग म्हणून विद्यापीठात एसीपीपीयू रिसर्च पार्क उभारले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषिक्षेत्र, इलेक्ट्रिकल मोबेलिटी, आरोग्यसेवा, पाणी आदी क्षेत्रात काम सुरु आहे. विद्यार्थ्यांना इनोव्हेशन, स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देत आत्मनिर्भर बनविण्याचा, तसेच रोजगार निर्मिक बनविण्याचा प्रयत्न आहे. ‘एआयटी’ विद्यापीठांशी संलग्न माझीच संस्था आहे. त्यामुळे डॉ. गंगाखेडकर यांना जीवनगौरव प्रदान करताना मलाही आनंद होतो आहे. तक्षशिला, नालंदा विद्यापीठांप्रमाणे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे शिक्षण द्यायला हवे.”
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारत आनंद व्यक्त करून डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, “लष्कराची शिस्त इथल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्येही दिसत आहे. माझीही लष्करी सेवेत जाण्याची इच्छा होती. मात्र शक्य झाले नाही, नागरी सेवेत आलो. साथरोग तज्ज्ञ म्हणून कोविड व्यवस्थापन करताना नवीन गोष्टी शिकत संशोधन करत होतो. जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरू न देता यावर काम करणे गरजेचे असल्याने हे आव्हान सोपे नव्हते. काहीअंशी ही जबाबदारी पार पाडण्यात यश आले असावे. कोरोनाने अनेक गोष्टी शिकवल्या. आर्थिक बाजू भक्कम करण्यासह स्वतःची, कुटुंबीयांची काळजी घेणेही महत्वाचे असल्याचे अधोरेखित झाले. लोकांमधील संवेदनशीलता जागृत झाली. आपण सुरक्षित, तर आजूबाजूचे वातावरण सुरक्षित, हे समजले. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. या काळात देशाच्या नेतृत्वाकडून, जनतेकडून खूप सहकार्य मिळाले.”
बलजीत सिंग म्हणाले, “या सन्मानाबद्दल ‘एआयटी’ परिवाराचे आभार मानतो आणि ‘सिम्बो’च्या टीमला हा सन्मान समर्पित करतो. त्यांचे योगदान मोलाचे आहे. प्रामाणिक प्रयत्नातून आम्ही ध्येय साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत.” प्रवीण प्रकाश म्हणाले, “माझ्यासाठी हा सर्वोत्तम पुरस्कार आहे. ‘एआयटी’ने आम्हाला घडवले. विविध कौशल्यांसह चांगला अभियंता बनवले. माझ्या यशात सर्वांचे योगदान आहे. चांगल्या कामातून आम्ही संस्थेचे नाव आणखी उंचीवर नेऊ.”
हिमांशू या विद्यार्थ्यास ‘ऑलराउंडर बेस्ट स्टुडंट’चा, तर दिव्या भारती हिला ‘बेस्ट गर्ल स्टुडंट अकॅडमिक’चा फिरता करंडक, आर्या कुशवाह हिला खेळासाठी जी. राजशेखर मेमोरियल पुरस्कार मिळाला. यासह टाटा, झेडएस असोसिएट, पर्सिस्टंट फाउंडेशन, हॉरिझॉन ग्रुप, बडवे ग्रुप, हॅशमॅप, उडचलो ग्रुप, इंडियन एक्सप्रेस यांनी उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रायोजित केलेली पारितोषिके विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आली. यामध्ये डॉ. गणेश मुंडे, डॉ. संगीता जाधव, गीता पाटील, युवराज घोलप, डॉ. यु. व्ही. अवसरमल, आर. एस. वर्मा, राघू बाबर, दिलीप सिंग यांचा, तर सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. सीमा तिवारी यांचा गौरव करण्यात आला. ब्रिगेडियर अभय भट यांनी संस्थेच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले, तर कर्नल के. ई. विजयन यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...