Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ज्या महिलांनी, खलाशी हे करियर निवडले, त्यांनी चाकोरी मोडून नवे मार्ग स्वीकारले आहेत – परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री

Date:

मुंबई-केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते आज,  सागरी क्षेत्रात कार्यरत, महिलांचा आंतरराष्ट्रीय  महिला दिनाचे औचित्य साधून झालेल्या समारंभाचे मुंबईत उद्घाटन झाले. भारतीय जहाजबांधणी महामंडळाच्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.

आजचा हा समारंभ विशेष होता कारण, गेल्याच वर्षी म्हणजे 2021 साली संयुक्त राष्ट्र सागरी संस्थेने, 18 मे हा सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीचा दिन म्हणून जगभर साजरा केला जावा, असा ठराव मंजूर केला होता. याचे औचित्य साधून हा विशेष कार्यक्रम आज साजरा करण्यात आला.

जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत, याशुकाता फुकाहोरी हे ही या समारंभाला उपस्थित होते. त्याशिवाय, भारतीय जहाजबांधणी महामंडळाच्या महिला अधिकारी आणि एमटी स्वर्ण गोदावरी या जहाजांवरील महिला खलाशांचा चमू देखील यावेळी उपस्थित होता.

यावेळी मीनाक्षी लेखी यांनी, भारतीय जहाजबांधणी महामंडळाच्या महिला अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी कॅडेट्ससह जहाजवरच योगाभ्यास करुन, योग उत्सव 2022 मध्ये सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय योगदिनाची उलटगणती आता सुरु झाली असून, त्यानिमित्त देशभर योग उत्सव साजरा केला जात आहे. भर समुद्रात एमटी स्वर्ण गोदावरी जहाजावरच, मंत्री महोदया आणि अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन, आगळ्यावेगळ्या पद्धतीने समारंभ साजरा केला. 

भारतीय जहाजबांधणी महामंडळाने, सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांच्या पहिल्या आतंरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत, या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता दरवर्षी 18 मे रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान, तसेच या क्षेत्रात अधिकअधिक महिलांच्या भरतीला प्रोत्साहन देण्यासह, या पुरुषप्रधान व्यवसायात, महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जाणार आहे. या क्षेत्रात, महिला सध्या केवळ दोनच टक्के असून, त्यात, लक्षणीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यावेळी लेखी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा भाग म्हणून पाचवे उद्दिष्ट- लिंगभेद समानता साध्य करण्यासाठी तसेच, सागरी उद्योगात, सध्या असलेली स्त्री पुरुष असमानता दूर करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी भारतीय नौदलात महिलांची संख्या सर्वाधिक म्हणजे 6.5% असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले सामर्थ्य, कर्तृत्व सिद्ध केले असून खलाशी हा व्यवसायही त्याला अपवाद नाही, असे त्या म्हणाल्या. याच मुद्दयाबद्दल बोलतांना त्यांनी ‘नाविका सागर परिक्रमेचे’ उदाहरण दिले. भारताच्या सर्व महिला खलाशांनी भारतीय नौदलाच्या ‘तारिणी’ या जहाजवरून जगाची सागरी सफर यशस्वीपणे पूर्ण केली होती. 1957 साली, भारतीय महिला, सुमाई मोराजी यांनी जहाजमालकांच्या संघटनेचे प्रमुखपद स्वीकारून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे, याचा गौरवपूर्ण उल्लेख  लेखी यांनी केला. त्या काळात, इतक्या मोठ्या देशांतही, अशी परंपरा नव्हती. भारताने हा निर्णय घेत नवी आधुनिक परंपरा निर्माण केली. असे त्या पुढे म्हणाल्या. याचाच संदर्भ पुढे नेत, त्या म्हणाल्या की “आपला समाज प्रागतिक आहे. भारतात महिला आणि पुरुषांना समानतेची वागणूक आणि सन्मान देण्याची जुनी परंपरा आहे.”

यावेळी लेखी यांनी, उल्लालच्या राणी अबकका यांचा उल्लेख करत, त्यांनी पोर्तुगीजांशी केलेल्या लढाईचे वर्णन केले, तसेच, झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांनीही आपल्या पाठीवर मूल बांधून  इंग्रजांशी युद्ध केले. समाजात असलेल्या मोकळेपणामुळेच झाशीच्या राणीला हे युद्धकौशल्य शिकणे सोपे गेले..

जहाजांना किंवा नौकांनाही ‘ती नौका’ असे म्हटले जाते, असाही उल्लेख केला, यामागची कल्पना अशी असेल माता किंवा देवता, आपल्या जहाजाप्रमाणेच, मोठे सामर्थ्य असलेल्या हव्यात. महिलांसाठी सागरी सफारीचे नेतृत्व करणे, सोपे आहे, असे त्या म्हणाल्या.

महिला खलाशांचे अभिनंदन करत, मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, “की तुम्ही, सामर्थ्य, धैर्य साहसाचे जिवंत प्रतीक आहात.” ज्या महिलांनी खलाशी हे करियर म्हणून स्वीकारले आहे, त्यांनी जुन्या चौकटी मोडल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. आज आपण सगळे जण अमृतमहोत्सव साजरा करत असताना, एक समाज म्हणून आपण असा संकल्प करायला हवा, की आपल्या महिलांना त्यांच्या आवडीची जहाजबांधणी क्षेत्रासारखी साहसी क्षेत्रे निवडता यावीत यासाठी प्रोत्साहन देऊ, आणि जमेल तेवढी मदत करु. केंद्र सरकार आणि जहाजबांधणी महामंडळ सर्व मुलींना समान संधी आणि सुरक्षितता देण्यासाठी सातत्याने परिश्रम करत आहेत, असे त्यांनी सांगितले. जहाजबांधणी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, एच. के जोशी आणि इतर महिला अधिकारी यावेळी उपस्थित होत्या

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...