‘या देशातील लज्जास्पद सत्य हे आहे की, अनेक भारतीय दलित, मुस्लिम व आदिवासींना माणूसच मानत नाहीत’ – राहुल गांधी

Date:

देशात जातीयवादाने सर्वत्र थैमान घातले असताना आज कॉंग्रेसचे नेते आणि गांधी परिवारातील सदस्य राहुल गांधी यांनी मोठे महत्वपूर्ण पण उद्विग्न असे विधान केले आहे .

या देशातील लज्जास्पद सत्य हे आहे की अनेक भारतीय देशातील दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहेत.

हाथरस प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. मात्र आता या हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यावरून उत्तर प्रदेश पोलीस व योगी सरकारवर टीका केली जाते आहे. यावरुनच आता राहुल गांधींनीही निशाणा साधला आहे.

‘या देशाचे लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्री (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) आणि त्यांचे पोलिस म्हणत आहेत की, कुणीही बलात्कार केलेला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती कुणीही नव्हती’ असे म्हणत राहुल गांधींनी यूपी सरकारवर निशाणा साधला आहे.दरम्यान सध्या हाथरसमधील सामूहिक बलात्काराचा तपास सुरू आहे. यूपी सरकारने शिफारस केल्यानंतर हा तपास सीबीआयकडे दिला आहे. मात्र तरीही या प्रकरणावरून योगी सरकारवर होणारी टीका अजूनही सुरूच आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर निशाणा साधला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेश बिडकरांच्या महा ई-सेवा केंद्रातून तब्बल २७ हजार लोकांनी घेतला लाभ

पुणे : शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही स्वतंत्र लढू, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे विधान

मुंबई-"पुण्यात जर दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार...

ठाकरे बंधू एकत्र येताच भाजपने रणनीती बदलली:शिंदे गटासाठी जागांची संख्या वाढवली, तरीही नाराजी

मुंबई-आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि...