संसदेचे पावसाळी अधिवेशन19 जुलैपासून चालणार 19 दिवस कामकाज

Date:

नवी दिल्ली- संसदेचे यावर्षीचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात कामकाजाचे 19 दिवस असणार आहे. हे अधिवेशन 19 जुलैपासून सुरु होणार असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

RTPCR चाचणी सर्वांना असेल अनिवार्य
अधिवेशनादरम्यान, कोरोना प्रॉटोकॉलचे पुर्णपणे पालन केले जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणी सर्वांना अनिवार्य असेल. सर्व सदस्य आणि माध्यमांना परवानगी दिली जाणार असून त्यांनी लस घेतली आहे का? हे तपासले जाणार आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे बिर्ला यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षी 14 सप्टेंबर सुरु झाले होते अधिवेशन
संसदेचे पावसाळी अधिवेशन हे दरवर्षी जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होते. स्वातंत्र्य दिनाच्या आधी हे अधिवेशन संपवले जाते. पण गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत सुरु ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षीदेखील कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत अधिवेशन घेण्यात आले होते.

शेतकरी कायदा रद्द करण्याची होऊ शकते मागणी
हे पावसाळी अधिवेशन 19 दिवस चालणार आहे. अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्ष सरकारला कोरोना, शेतकरी कायदे रद्द करण्याची मागणी करु शकते. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार गदारोळ होऊ शकतो. त्यासोबतच केंद्र सरकार या अधिवेशनामध्ये अनेक विधेयक सादर करु शकते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...