कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरु केलेली योजनाही सरकारला राबवता आली नाही-दरेकरांची सरकारवर टीका

Date:

मुंबई दि.२ मार्च*  :शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व दलालांचे उच्चाटन करण्यासाठी कै.बाळासाहेब कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची घोषणा सरकारने एक वर्षापूर्वी केली होती, परंतु, ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला त्यांच्या नावाने सुरु केलेली योजनाही सरकारला राबवता आली नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी सरकारवर केली.दरेकर आज विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलत होते.   त्यांनी असेही सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने माननीय राज्यपालांवर टीका करण्याचं काम केलं, राज्यपालांसारख्या सांविधानिक पदाची गरीमा घालवण्याचं काम राज्य सरकारच्या  प्रमुखांनी केलं आहे. परंतु, एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना आपण जनतेसाठी काय दिवे लावले, याचाही विचार सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे.   करोना उपाययोजनांवर बोलत असताना दरेकरांनी महाराष्ट्रात ५२,००० लोकांचा मृत्यू झाला असताना त्याबाबत चिंता करण्याऐवजी सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे, डब्ल्यूएचओने धारावीच अभिनंदन केलं, त्या डब्ल्यूएचओला आणि जगाला दिशा देण्याचं काम मोदींनी केलं. केंद्र सरकारने करोनासाठी सर्वच राज्यांना मदत केली, महाराष्ट्रालाही केली, परंतु, त्याचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात केलेला नाही.  राज्याच्या योजनांच्या बाबतीत बोलताना दरेकर यांनी सांगितलं की, विकेल ते पिकेल अभियानात १३४५ मूल्य साखळी विकासाचे प्रकल्पाचे नियोजन सरकारने केले, परंतु, आजपर्यंत त्यांना स्टाफ सुध्दा दिलेला नाही, या योजनेची सरकारला ५% सुद्धा अंमलबजावणी करता आलेली नाही, अशीच अवस्था अनेक सरकारच्या निर्णयांची असून सरकारने जाहीर केलेल्या निर्णयांची, योजनांची अंमलबजावणी करण्यात सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...