सरकारची बहुमत चाचणी घ्या- देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी

Date:

तब्बल ९ दिवसांनी भाजपची उघड एंट्री

राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल

आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरील सुनावणी सुप्रीम कोर्टात १२ जुलैला असताना राज्यपाल काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता

शह आणि काटशह, डावपेचाचे राजकारण

मुंबई-आज दिल्लीवारी नंतर रात्री विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे.त्यावर राज्यपाल यावर निर्णय घेतील. दरम्यान राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं होतं. त्यासंदर्भात राजभवनने स्पष्टीकरण देत हे पत्र खोट असल्याचं सांगितलं.काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारच्या बहुमताच्या चाचणीसाठी मागणीचे पत्र दिले आहे. त्यावर राज्यपाल आता निर्णय घेणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. सरकारला लवकरच आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

यासंदर्भात बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या ३९ आमदारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सध्या सरकार अल्पमतात चालू आहे म्हणून आम्ही राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे.” असं ते म्हणाले.

राज्याच्या सत्तासंघर्षात तब्बल ९ दिवसांनी भाजपने उघड एंट्री केली आहे. दरम्यान बंड केलेल्या आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने १२ जुलै पर्यंत लांबवली आहे. आता राज्यपालांच्या निर्णयाकडेही लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...