Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पगारासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन विनाअनुदानीत शिक्षकांचे कुटुंबासमवेत आझाद मैदानावर आमरण उपोषण

Date:

मुंबई-राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचे185 वे आंदोलन आता तीव्र झाले असून पगार आणि शंभर टक्के अनुदान या मागण्यांसाठी या शिक्षकांनी आझाद मैदानात तब्बल ५० वे आंदोलन दिनांक २९-१०-२०१६ पासून सुरू केले आहे.

या शिक्षकांच्या संघर्षांला पुन्हा वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृति समितीला ऐन दिवाळीत आमरण उपोषण राज्याध्यक्ष प्रा.तानाजी नाईक व पत्नी,मुले,मुलगी प्रा.संतोष
वाघ,प्रा.अनिल परदेशी,प्रा.राहुल कांबळे,प्रा.गुलाब साळुंखे प्रा.अविनाश
पाटील,प्रा. श्रीराम सूर्यवंशी,प्रा.पृथ्वीराज चव्हाण प्रा.संजय
पाटील,प्रा.हुसैन शैख,प्रा.अमोल धुळप,प्रा.समाधान शेजाळ,प्रा.अमरसिंह
खांडेकर,प्रा.प्रवीण सरवडे,प्रा.दत्तात्रय सूळ,प्रा.युवराज
लेंगरे,प्रा.नितेश केळकर, यांच्यावर करण्याची वेळ आली असून त्याद्वारे
सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राज्यात २४ नोव्हेंबर २००१मध्ये सरकारने कायम विना अनुदानित
धोरण लागू केले. या धोरणामुळे शिक्षकांना सरकारकडून गेल्या १६
वर्षांपासून वेतन मिळालेले नाही. सध्या राज्यात कायम विना अनुदानित उच्च
माध्यमिक ३१९० शाळा असून ११,८४८ तुकडय़ा आहेत. तर, ज्युनिअर कॉलेजात
दरवर्षी १२ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच या दोन्ही प्रकारच्या
संस्थांमध्ये मिळून २१५०० हजार शिक्षक कार्यरत आहेत. सरकारच्या कायम विना अनुदान धोरणामुळे विद्यार्थ्यांना वारेमाप फी भरावी लागत आहे. तर
पगारविना शिक्षकांची अवस्था वेठबिगारांसारखी झाली आहे. ग्रामीण भागात
विद्यार्थ्यांना गावातच किवा गावाजवळ शिक्षण उपलब्ध व्हावे,यासाठी
शासनाने मोठ्या संख्येने उच्च माध्यमिक विद्यालयांना ‘कायम विनानुदानीत”
तत्वावर सन २४/११/२००१ पासून मान्यता देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य
कायम विनाअनुदानीत उच्च माध्यमिक कृती समिती राज्याध्यक्ष तानाजी नाईक यांच्याकडून अनुदानाची मागणी केली जात होती म्हणून आघाडी शासनाच्या काळात २६/२/२०१४ रोजी कायम शब्द वगळून अनुदान देनेबाबत शासन निर्णय निर्घमित करण्यात आला.
यानुसार या कनिष्ठ महाविद्यालये,उच्चमाध्यमिक,शाळा,विभाग
तुकड्या यांचे मुल्यांकन करून सन २०१४-१५ साठी लागणारा नियतव्यय (आर्थिक तरतूद )स्वतंत्ररीत्या उपलब्ध करून देण्यात येईल असे दि.२६/२/२०१४च्या शासन निर्णयात म्हटले असून यास आता ३ वर्ष इतका काळ पूर्ण होत
आहेत.नंतरच्या काळात या शाळांचे मुल्यांकन झाले मुल्यांकनात पात्र
शाळांचे प्रस्ताव शिक्षणआयुक्त कार्यालय पुणे येथून मुंबई मंत्रालय
शिक्षण विभाग येथेonline घोषित करून अनुदानाकरिता पाठविले होते परंतु हे
प्रस्ताव शिक्षण विंभाग मंत्रालय यांच्याकडून वापस शिक्षण आयुक्त
कार्यालय पुणे यांच्याकडे परत पाठविले गेल्याने यंदाची हि दिवाळी
प्राध्यापकांची अंधारात जात असल्याने प्रचंड नाराजी दिसून येत
आहे.१६वर्षाचा विनावेतनाचा वनवास संपवण्यासाठी सदर प्रस्ताव सचिव शालेय
शिक्षण विभाग मंत्रालय यांनी पुन्हा त्वरित आयुक्त कार्यालय पुणे
यांच्याकडून बोलवून त्वरित अनुदानाकारिता मूल्यांकनात पात्र शाळांची यादी
online घोषित करून १००%अनुदानाची तरतूद करून या प्राध्यापकांना पगार
द्यावा, उर्वरित मूल्यांकन प्रस्तावाचे कामकाज पूर्ण करून अनुदान पात्र व
त्यासबंधी अनुदानाची १००%आर्थिक तरतूद करून जाहीर करावी. उर्वरित उच्च
माध्यमिक शाळांच्या ऑफलाईन मूल्यांकनाचे आदेश देण्यात यावे. सर्व
शिक्षकेतर कर्मचार्री यांच्या वैयक्तिक मान्यतेची आदेश देण्यात यावे,
मान्यतेपासून आतापर्यंत काम करणारया शिक्षक व कर्मचारयांना सेवा शर्ती
लागू कराव्यात, सेवा, वरिष्ठ वेतन श्रेणी, वेतन योजना, इत्यादीसाठी
आतापर्यंतची सेवा ग्राह्य धरावी, कायम विना अनुदानित शाळांना वेतनत्तर
देण्यात यावे यासारख्या अनेक मागण्यासाठी त्यांनी आता आमरण उपोषणचा
पर्याय अवलंबला आहे, असे संघटनेतर्फे प्रसिद्धी प्रमुख अनिल परदेशी
यांच्याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...