Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सुर्यदत्ता महाविद्यालयाच्या चित्रपट महोत्सवामध्ये अक्षय काकडे,भावेश पाटील,सुनील वंजारी ठरले उत्कृष्ट

Date:

पुणे : सुर्यदत्ता महाविद्यालयाच्या व्यवस्थापन, संशोधन, माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे प्रथमच चित्रपट महोत्सव भरविण्यात आला होता. यामध्ये अनिमेशन विभागात अक्षय काकडे यास उत्कृष्ट दिग्ददर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच नॉन फिक्शन विभागात भावेश पाटील यांच्या ‘बळीराजा’ चित्रपटास तर फिक्शन विभागात सुनील वंजारी यांच्या ‘कोष’ या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी वैभव ठाकरे, डॉ चिन्मय खराडे आणि अवधूत नवले यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. याबरोबबरच स्पर्धेकांना त्यांच्या कलाकृतीतील वेगळेपण व त्रुटी या दोन्ही गोष्टींवरही मार्गदर्शन केले.

फिक्शन, नॉन फिक्शन आणि अनिमेशन अशा प्रमुख तीन वर्गवारीत घेण्यात आलेल्या स्पर्धेत १५ हून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयाच्या बावधन शाखेच्या परिसरात हा महोत्सव पार पडला. यावेळी सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूट चे संस्थापक -संचालक संजय चोरडिया उपस्थित होते.

उत्कृष्ट कलाकृती सादर करण्यासाठी कल्पकता, सृजनशीलता आणि नाविण्यता असणे अत्यावश्यक असते.सध्याच्या पिढीत ही ताकद आहे परंतु, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. चित्रपट महोत्सवाचे आयोजन करून सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटने एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला असून येत्या काळात राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सव भरविण्यासही ‘सुर्यदत्ता’ सक्षम असल्याचे गौरवोत्तगार चिल्ड्रन फिल्म सोसायटी, भारत आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण कुमार यांनी काढले.

कुमार म्हणाले की, चित्रपट निर्मिती क्षेत्रातील संधीमुळे करीयरच्या असंख्य वाटा निर्माण झाल्या आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला सुप्रसिद्ध व बहुचर्चित असा बाहुबली चित्रपट याचेच एक उत्तम उदाहरण आहे. नाविण्यपूर्ण कल्पनांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास एक सर्वोत्तम कलाकृती घडते व ती प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडू शकते, हे या चित्रपटाने सिद्ध करू दाखविले आहे. हे लक्षात घेऊन, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत व कष्टाची विद्यार्थ्यांनी तयारी ठेवावी, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी चोरडिया म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली कल्पकतेला आणि क्षमतेला दडवून न ठेवता त्यातून नवनवीन प्रयोग साकारून आपल्या कल्पना शक्तीला चालना  दिल्याने कल्पकतेला वाव मिळत राहतो तसेच त्यातूनच वेगवेगळ्या संधी देखील निर्माण होतात. सुर्यदत्ता नेहमीच विद्यार्थ्यांना  नवनवीन कल्पनांसाठी प्रोत्साहन देत राहील. अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...