बेळगावात छत्रपती शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला; सीमा भागासह कोल्हापूरात तीव्र पडसाद, कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Date:

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील (ता. हुक्केरी) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रात्रीत हटवला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी सीमाभागा सह कोल्हापूर जिल्ह्यात उमटले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांनी पुतळा त्वरीत बसवावा अन्यथा बेळगावात जाऊन आंदोलन करु असा इशारा दिला आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री दोन गटांनी या भागाचे आमदार सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी सांगितले की माझ्या हस्ते शिवपुतळा चबुतऱ्याचे पूजन होऊन या ठिकाणी पुतळा बसविण्याचा निर्णय झाला आहे. परंतु तुम्ही रातोरात पुतळा बसवण्याची घाई का केली? याला कायदेशीर परवानगी घेऊन तेथे पुतळा बसवूया, तोपर्यंत हा पुतळा हलवून सुरक्षित जागी ठेवा. पंधरा दिवसानंतर याबाबत मी निर्णय घेतो असे आश्वासन आमदारांनी दिल्याचे पंच व पुतळा कमिटीचे म्हणणे आहे.आमदारांच्या आश्वासनानंतर गावातील पंच मंडळी व पुतळा कमिटीच्या सदस्यांनी शनिवारी मध्यरात्री पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचे बोलले जात आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता हुक्केरीचे तहसीलदार अशोक गुराणी व पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याण शेट्टी देखील उपस्थित होते. याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पुतळा बसविण्यास परवानगी दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. स्थानिक ग्रामपंचायतीची त्यास परवानगी असतानाही कर्नाटक सरकारने पुतळा हटवला आहे. सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार आहेत.महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे प्रतिष्ठापित छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कर्नाटक प्रशासनाने काही मोजक्या संघटना आणि लोकांच्या दबावाखाली येत रातोरात हटवली आहे, त्याचा तीव्र शब्दात निषेध. मागील काही दिवसांपासून कर्नाटकात सोशल मीडियावर अवमानकारक लिखाण, पुस्तकातून महाराजांचा इतिहास काढून टाकणें, आणि मूर्ती हटवणे असे अवमानकारक प्रकार वाढत आहेत, प्रशासनाने हे प्रकार वेळीच थांबवावेत, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्याबाबत झालेला अवमान शिवभक्त सहन करू शकत नाहीत. याचसाठी येत्या सोमवार दिनांक 10 ऑगस्टला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...