मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार अवघ्या 4 महिन्यांत कोसळेल, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. शिंदे गटातील नाराजी पाहता त्यांचे काही आमदार आमच्या गटात येतील, असे त्यांनी म्हटले आहे.शिंदे गटातील अनेक आमदारांची नाराजी उजेडात येत आहे. त्यामुळे त्यांच्यात सर्वकाही ठिक नसल्याचे स्पष्ट होत आहे. कृषीमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर पडताना चिडचीड करताना दिसून आले. तर प्रताप सरनाईकांच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा लागला आहे, असे अंधारे म्हणाल्या. सरनाईकांची जागा भाजपला हवी असल्यामुळे असे केले जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
वैजनाथ वाघमारेंना शुभेच्छा
गेली 4 ते 5 वर्षे मी विभक्त आहे, मी त्यांना शुभेच्छा देते, वैजनाथ वाघमारेंना अचानक प्रवेश दिला आहे. भावना गवळी यांचे पती सुर्वे आमच्यासोबत आहेत, हे केवळ राजकारण आहे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते असे म्हणत भविष्यात सुषमा अंधारे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे. बाळासाहेबांचे नाव उद्धव ठाकरे नाही घेणार तर कोण घेणार. भातखळकर काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही, त्यांच्यावर बोलणे इतके महत्त्वाचे नाही, अब्दुल सत्तारांना, गुलाबराव पाटील यांना आहे का असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.
खासदार संजय राऊतांना अटक करण्याची गरज नव्हती, अटक बेकायदेशीर होती असे कोर्टाने निरीक्षण नोंदवले असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.
सय्यद यांच्या प्रवेशाला भाजपचा विरोध
दीपाली सय्यद यांचा प्रवेश रखडण्यापाठीमागे त्यांनी भाजपविरोधी केलेली वक्तव्ये असल्याचे माझ्या कानावर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेली वक्तव्य यामुळे सय्यद यांचा पक्षप्रवेश रखडला असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यावर जोपर्यंत दीपाली सय्यद माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांचा प्रवेश होणार नाही, अशी भूमिका भाजपकडून त्यांच्या प्रवेश होऊ दिला जाणार नाही असा दावाच अंधारे यांनी केला आहे. 9 तारखेला त्या प्रवेश करणार होत्या, आणि आज 13 तारीख उजाडली आहे, यामुळेच भाजप त्यांचा प्रवेश करुण घ्यायला तयार नाही, असा टोला अंधारेंनी लगावला आहे. प्रवेश करणे हे त्यांचा विषय त्यात आम्ही पडणार नाही.