‘स्‍टार्च हवंय विचारांना!’- विविधरंगी काव्‍यफुले

Date:

            

(समीक्षकराजेंद्र सरग-9423245456)

‘स्‍टार्च हवंय विचारांना!’ या शीर्षकाचा प्रतिभा शिवाजी मगर यांचा कवितासंग्रह वाचला. सामाजिक प्रबोधनपर शीर्षक असले तरी यात विविध काव्‍यप्रकार हाताळण्‍यात आले आहेत. इयत्‍ता आठवीपासून कविता करत असल्‍या तरी कवयित्रीचा हा पहिलाच कवितासंग्रह.

            आशय आणि अभिव्‍यक्‍तीचा विचार केला तर प्रत्‍येक कविता स्‍वत:ची ओळख निर्माण करते. कवयित्रीने एक विशिष्‍ट शैली न स्‍वीकारता वेगवेगळ्या शैलीचा वापर केला आहे. वारी, दिंडी, गौरी शंकराचे बाळ, पांडुरंग, विठू, भोळ्या शंकरा या कवितांमधून भक्‍तीरस पाझरतो. तर ‘मेघाने लावला फास, ‘शेती म्‍हणजे ब्‍लू व्‍हेल गेम’ या सारख्‍या कवितांमधून संतापाचा लाव्‍हारस अनुभवयाला मिळतो. स्‍त्री शिक्षणावरची कविता ‘रेशमाच्‍या रेघांनी, लाल काळ्या धाग्‍यांनी’ या गीताच्‍या चालीवर गुणगुणायला लावते तर ‘ग्रहण नव्‍हे ती भेट’ ही कविता ‘ग्रहण’ या खगोलीय घटनेचा वेगळा अर्थ सांगून जाते.

            काही कविता तर केवळ शीर्षक वाचूनच त्‍यातील भावना वाचकांपर्यंत पोहोचवण्‍यात यशस्‍वी होतात. तरीही कवयित्रीच्‍या मनातील संवेदना कविता वाचल्‍यानंतर खऱ्या अर्थाने जाणवतात. ‘आई म्‍हणजे..’ , ‘बाप म्‍हणजे…’ , ‘मैत्री म्‍हणजे…’, ‘पुरुष म्‍हणजे…’, ‘शिक्षक म्‍हणजे…’,  ‘कविता म्‍हणजे… ‘ , ‘शेती म्‍हणजे…’ या कविता त्‍याचे प्रातिनिधीक उदाहरण ठराव्‍यात.

            कवयित्री पेशाने शिक्षीका असल्याने शाळा, विद्यार्थी, त्‍यांच्‍या बरोबर जडलेले नाते, भावी नागरिक घडवतांनाची तळमळ, त्यांच्‍या कडील अपेक्षा, जबाबदार आणि देशभक्‍त नागरिक होण्‍यासाठी करावे लागणारे संस्‍कार हे सारे कवितांमधून प्रकट झाले आहेत. वारकरी संप्रदायाचा वारसा आणि शेती संस्‍कृतीचे मिळालेले बाळकडू हेही आपल्‍याला कवितांमधून पहायला मिळते. माहेरवाशीण म्‍हणून माहेराच्‍या आठवणी, प्रबोधनकारी, संदेशपर अभंग, हायकू, भक्‍तीरस, शृंगाररस अशा काव्‍यप्रकारांनी हा कवितासंग्रह एक विविधरंगी फुलांचा गुच्‍छ झालेला दिसतो.

            कवयित्रीने सभोवताली घडणाऱ्या घटनांवरही संवेदनशील पण कुठेही आक्रस्‍ताळेपणा न करता संयतपणे आपल्‍या भावना मांडल्‍या आहेत. सखोल विचारमंथनातून, अंत:प्रेरणने सुचलेले हे विचार काव्‍यबद्ध करतांना वाचकांच्‍याही मनाचा ठाव घेतात. मानवी जीवन आणि जगणे सुंदर करण्‍यासाठीच हा सारा खटाटोप कवितासंग्रहातून करण्‍यात आलेला आहे. महिला सबलीकरण, सशक्‍तीकरण यावरही बदलत्‍या स्‍त्री जाणिवांचा वेध घेण्‍यात आला आहे. ‘आधुनिक सावित्री’, ‘लक्‍तरं’, ‘भुकेचे आभाळ’ ‘बाईपणाचे चटके’ या कविता स्‍त्रीजीवनावर नव्‍याने प्रकाश टाकतात.

            कविता ही कवयित्रीची जीवलग मैत्रीण. त्‍यांनीच म्‍हटल्याप्रमाणे.. ‘आठवीत असतांना पहिली कविता लिहीली. वडलांनी (त्र्यंबक लोकरे) तोंड भरुन कौतुक केले. लिखाणास बळ दिले. वडिल शिक्षक तेही स्‍वरचित पोवाडे, एकांकिका, नाटकं सादर करीत. वडिलांच्‍या बदलीमुळे होणारी भ्रमंती, मग तिथल्‍या मातीशी जुळणारी नाळ, मैत्री, रुसवे-फुगवे, मनाची होणारी जडण-घडण यात कविता कधी अल्‍लड तर कधी हट्टी झाली. वयानुसार गुलाबी स्‍वप्‍नात रमू लागली. हळव्‍या क्षणांची सोबती झाली. वैवाहिक जीवनात एक जीवलग सखी झाली. कविता समृद्ध करण्‍यास कुटुंबाची साथ मिळाल्‍याबद्दल त्‍या स्‍वत:ला धन्‍य समजतात.

            सभोवतालची परिस्थिती पाहून कवयित्रीचे मन चोळामोळा झालेय फाटक्‍या सदऱ्यासारखं .. काम, क्रोध, ईर्षा, लोभ, दंभ, गर्व आणि जिंकण्‍यासाठी वाट्टेल ते केले जात असल्‍याने अघोरी घड्या मनावर पडल्‍या. त्यामुळे विचारवस्‍त्र चुरगळून गेले आहे.

एक एक घडी निपटून काढण्‍यासाठी

आत्‍मचिंतनाच्‍या स्‍टार्चमध्‍ये बुडवून

सद्सद्विवेक बुद्धीची कडक इस्‍त्री मारुन

स्‍टार्च केले तर....!

पोतेरा झालेले विचारवस्‍त्र

पांडुरंगाच्‍या पितांबरासारखे

पवित्र आणि सुंदर होऊन

स्‍वयंतेजाने चकाकणार आहे

आणि त्‍यातला एक एक प्रकाशकिरण

पसरलेला अंधकार मिटवणार आहे

म्‍हणूनच विचारांना स्‍टार्च हवं आहे स्‍टार्च… !

            कवयित्रीने कल्‍पनेच्‍या विश्‍वात रमतांनाही वास्‍तव आणि समाजप्रश्‍नांचा विसर पडू दिलेला नाही. आत्‍मभान आणि समाजभान या दोन्‍ही टोकांच्‍या दरम्‍यान त्‍यांची कविता वाचकांना सहजतेने फीरवून आणते.

तू दिलीस हाती लेखणी

म्‍हणून चंद्रावरही गेलो

तुझ्या स्‍वयंप्रकाशित तेजात

साऊ आम्‍ही सूर्य गं झालो

या कवितेत त्‍या साऊ म्‍हणजे सावित्रीबाई फुले यांच्‍या विषयी ऋण व्‍यक्‍त करतात आणि तिच्‍या वाटेवर चालतांना संस्‍कार शिदोरी जपण्‍याचा शब्‍दही देतात.

            ग्रहण म्‍हणजे सूर्य आणि चंद्र या दोन भावांची भेट. असा नवा विचार मांडतांना ‘कृष्‍णाची परीक्षा’ या कवितेत राधेला पहाण्‍याची ओढ कान्‍हाला लागू दे, असंही कवयित्री राधेला सुचवते

कृष्‍णासही विरहाचे

सोसु दे चटके जरा

घे सावळयाची परीक्षा

राधिके हटकी जरा

            जीवनाची व्‍यामिश्रता लक्षात घेता कवयित्रीने जीवनप्रवासात प्रत्यक्षरित्‍या आणि कल्‍पनेत अनुभवलेल्या भावनांचे विश्‍व हे प्रतिभा आणि काव्‍यातून वाचकांसमोर उभे केले आहे. हे जीवनविषयक चिंतनविश्‍व वाचकांना नवी अनुभूती देईल, अशी आशा आहे.

कवयित्री – प्रतिभा मगर  

मुखपृष्‍ठ – अरविंद शेलार

प्रकाशक –परिस पब्लिकेशन, सासवड (जि. पुणे)

पृष्‍ठं- 120  

किंमत- 150 रुपये

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...