उस तोडणी यंत्रांची संख्या वाढणे गरजेचे -सहकारमंत्री

Date:

पुणे— ऊस तोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रांसाठी अनुदान दिलेच पाहिजे कारण दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुराची संख्या कमी होत आहे. परिणामी ऊस तोडणी यंत्राची संख्या वाढणे गरजेचे आहे असे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले. याबरोबरच साखर कारखान्याच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहील त्याचे कारण कारखानदारी टिकली तरच ऊस उत्पादक टिकणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सहकारी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ” साखर परिषद २०-२० ” उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मंडळाचे सदस्य संजय भेंडे, अविनाश महागांवकर , साखर आयुक्त डॉ शेखर गायकवाड , राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. साखर परिषदेला राज्याच्या विविध भागातून साखर कारखान्यांचे पदाधिकारी ,संचालक उपस्थित आहेत.

श्री देशमुख म्हणाले कि, उस तोडणी साठीच्या यंत्रासाठी अनुदान देणे गरजेचे आहे, गेले काही महिने अनुदानाचा प्रश्न चर्चेत आहे. आज एकीकडे मजुराची संख्या कमी होत आहे त्याचा उस तोडणीiवर परिणाम होत आहे. म्हणूनच यंत्राची संख्या वाढणे गरजेचे आहे. कारखानदारी समोरील विविध प्रश्नाबाबत कारखानदारांनी चितन करण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षात शासनाचे काय चुकले याची चर्चा होताना दिसते . खरे तर त्याआधीपासून कोणती धोरणे चुकली याचा विचार करायला हवा. कारण अनेक कारखाने गेली काही वर्षांपासून बंद आहेत. त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. आज कारखाने चालवणे अवघड झाले आहे म्ह्णूनच कायम स्वरूपी उपाययोजना कार्याला हवी. साखर वाहतुकीच्या बाबत प्रस्ताव देण्यात यावा, तसेच कारखान्याच्या विस्तारीकरणाबाबत विचार करण्यात यावा, याबाबत नेमके धोरण ठरणे गरजेचे आहे. कारखान्याच्या १५ कि. मी च्या परिसरात ८० टक्के ऊस असेल तर विस्ताराला परवानगी दिली जावी याबाबत विचार करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.

या सत्रात रेणुका शुगर्स चे अध्यक्ष रवी गुप्ता यांनी राज्यातील साखर उद्योगाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल यावर मार्गदर्शन केले.

परिषदेच्या सकाळच्या सत्रात परवाना धोरण , सद्यस्थिती आणि अपेक्षा यावर चर्चासत्र झाले. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ यांनी सूत्रसंचालन केले. यामध्ये बोलता डॉ गायकवाड म्हणाले कारखान्यांनी आता रिटेलिंगकडे वळण्याची वेळ आली असून बँकावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे . अनेक कारखाने ५० वर्षापेक्षा अधिक काळ सुरु असले तरी त्यांना एफआरपी चा प्रश्न भेडसावत आहे हे चांगले चित्र नाही. यावर्षीच्या हंगामात उसाचे क्षेत्र घटले असून त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होणार आहे तसेच टनेज कमी होणार असून साखर उतारा कमी मिळणार आहे परिणामी साखर उद्योगाला काही कठोर निर्णय घेणे गरजेचे झाले आहे . त्याचबरोबर साखर उद्योगाबाबत दीर्घकालीन धोरण ठरवणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.

या चर्चासत्रात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सुधीर वास्तव, वैध मापन शास्त्र विभागाच्या उपनियंत्रक सीमा बैस ,औद्यीगिक सुरक्षा आणि आरोग्य सहसंचालक श्री गिरी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे हे सहभागी झाले श्री अनास्कर यांनी परिषदेच्या आयोजनामागची भूमिका मांडली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आंदेकर पुन्हा येणार ..उमेदवारी अर्ज भरायला ..आज अपूर्णच राहिले काम

पुणे-आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या...

अभिजित बाळासाहेब शिवरकर आणि माजी उपमहापौर दिलीप बराटे दोघे आज भाजपमध्ये …

केंद्रीय मंत्री मोहोळ आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्याकडून...

पुण्यात शिवसेनेला 25 जागा मिळाव्यात – डॉ. नीलम गोऱ्हे:

पुणे -महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेला किमान २५ जागा द्याव्यात,...

हातात बेड्या, तोंडावर काळं कापड अन् गळ्यात दोरखंड:आरोपी बंडू आंदेकरसह ३ आंदेकर निवडणुकीच्या रणांगणात

पुणे-'आंदेकर टोळी'चा म्होरक्या आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ...