- मुंबई-
प्रख्यात अभिनेते, नाटककार व साहित्यिक गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे सामाजिक जाण असलेला परखड विचारवंत काळाच्या पडद्याआड गेल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
गिरीश कर्नाड हे एक चतुरस्त्र व्यक्तीमत्व होते. अभिनय, नाटक आणि साहित्य या तीनही क्षेत्रात त्यांनी राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा उत्तुंग कामगिरी केली. पद्मभूषण, पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण कमळ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपती सुवर्ण पदक, संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. एकाच व्यक्तीला असे विविध क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळण्याची उदाहरणे अपवादानेच आढळून येतात. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचेअशोक चव्हाण यांनी कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले. केवळ एक कलावंत म्हणूनच नव्हे तर सामाजिक जाण असलेले अभ्यासू, परखड विचारवंत म्हणून सुद्धा गिरीश कर्नाड कायम स्मरणात राहतील, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
सामाजिक जाण असलेला परखड विचारवंत काळाच्या पडद्याआड! गिरीश कर्नाड यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली
Date:

