गृहमंत्री हि कि तो- हि ठाकरे पवारांची बदमाशी -लक्ष डायव्हटॅ करण्याचे काम -उल्लू बनविण्याचे काम
पुणे- गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन नुकताच त्यांनी खळबळजनक दापोली दौरा केला होता. या दौऱ्यानंतर किरीट सोमय्यांच्या रडारवर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा प्रकरणात कारवाईसाठी आज किरीट सोमय्या यांनी पुण्यात दंड थोपटले. हसन मुश्रीफ यांनी 158 कोटींचा घोटाळा केला असून हा पैसा 47 कंपन्यांमधून आला आहे. यामध्ये शेल कंपन्या देखील आहेत, असे किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुश्रीफ कुटुंबीयांकडे 47 कंपन्यांकडून पैसे आलेत. मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी 100 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक व्यवहार केला. हा पैसा कोणत्या कंत्राटदाराकडून आला? याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे-पवार सरकारची आहे. पण, ते चौकशी करत नाहीत. कारण, हे दोन्ही कुटुंब घोटाळेबाज आहेत, एक घोटाळेबाज दुसऱ्या घोटाळेबाजाला वाचवत आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली. तसेच हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार, असेही सोमय्या म्हणाले.
केंद्र सरकारची पुणे न्यायालयात तक्रार –
सोमय्या यांनी हसन मुश्रीफ कुटुंब आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात केंद्र सरकारने पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. त्यात फसवणूक, शेल कॉससाठी कलम 447 आणि 439 कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम 256 अन्वये कारवाईची विनंती केली आहे. पुढील काही दिवसांत यावर सुनावणी होणार आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी, बेनामी कायदा, आय़कर विभाग, मनी लाँडरींग याअंतर्गत कारवाई सुरू झाली आहे, असे सोमैय्या यांनी सांगितले.
आयकर सदन विभागात पोहचले सोमय्या –
किरीट सोमय्या हे पुण्यातील आयकर सदन या ठिकाणी महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोहोचले आहेत. हसन मुश्रीफ यांनी लुटीचा माल सरकारी तिजोरीत जमा करावा. संजय राऊत यांनी पहिला हप्ता म्हणून 55 लाख रुपये ED कडे भरले आहेत. त्यांच्याकडून मुश्रीफ यांनी काहीतरी शिकावे, असे किरीट सोमय्या म्हणाले.
गृहमंत्री हि कि तो- हि ठाकरे पवारांची बदमाशी -लक्ष डायव्हटॅ करण्याचे काम -उल्लू बनविण्याचे काम
गृहमंत्री हि कि तो असे वातावरण निर्माण करून लक्ष वळविण्याचे काम करण्यात येत आहे , हि ठाकरे पवारांची बदमाशी आहे असे सांगून त्यांनी आता लोकांना उल्लू बनविण्याचे काम करू नये असे म्हटले आहे .