Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जातिसंस्थेवर सरसंघचालकांचे वक्तव्य,आपल्या पूर्वजांनी चुका केल्या आहेत हे सत्य

Date:

नागपूर-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे जातीव्यवस्थेवरील वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. शुक्रवारी नागपुरात एका पुस्तकाचे प्रकाशन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी जात आणि वर्णव्यवस्था संपवण्याचे आवाहन केले आहे. भागवत म्हणाले – समाजाचे हित पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वर्ण आणि जातिव्यवस्था ही जुनी विचारसरणी होती, ती आता विसरायला हवी, असे म्हणायला हवे. भागवत त्यांनी ब्राम्हण हा जन्माने नाही तर क्रमाने ठरत असतो. धर्मशास्त्रात देखील हेच सांगितलं आहे. मात्र मधल्या काळात जातीभेदाची चौकट घट्ट झाली आणि मानवाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले . त्यामुळं आपण पापक्षालन करायला हवं असं भागवत म्हणालेत. 

विदर्भ संशोधन मंडळाच्यावतीने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी वा.वि. मिराशी सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी म्हटलं, “आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली.”

“वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कोणालाही विषमता नको. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत”, असेही भागवत म्हणाले.

“ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.

दसऱ्याच्या दिवशी रोजगारावरील वक्तव्यावरूनही झाला वाद

दसऱ्याच्या दिवशी नागपुरात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भागवत म्हणाले होते, ‘भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आर्थिक आणि विकासाचे धोरण रोजगाराभिमुख असावे ही अपेक्षा साहजिक असेल, पण रोजगार म्हणजे केवळ नोकऱ्या नाहीत, ही समज समाजात वाढवावी लागेल. कोणतेही काम प्रतिष्ठेच्या दृष्टीने लहान किंवा मोठे नसते; श्रम, भांडवल आणि बौद्धिक श्रम या सर्वांना समान महत्त्व आहे. उद्योजकीय प्रवृत्तींना प्रोत्साहन दिले पाहिजे. यामध्ये स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ते पुढे नेण्याची गरज आहे.

संघप्रमुखांच्या या वक्तव्यावर आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद म्हणाले होते की, ‘केवळ संघाच्या ठगांकडून प्रशिक्षण घेतलेले आणि संघाच्या महाखोट्या, महाकपटी शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन मते गोळा करतात? जेव्हा-जेव्हा आरएसएस-भाजप स्वतःच्या वक्तव्यांत अडकतात तेव्हा द्वेष पसरवणारे सज्जन न मागता ज्ञान वाटायला येतात.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले:जिन्नासमोर नेहरू झुकले..मोदींचा पुनरघोष

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरम्‌ला १५०...

अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार पेपर

मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21...

मुंढवा प्रकरणातील आरोपी तहसीलदाराने 85.50 लाखांची थकबाकी भरली रोख…

पुणे -मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या निलंबित...