Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गांधीजींची हत्या फाळणीच्या कारणाने झालेली नाही – संजय सोनवणी

Date:

आरएसएस हिंदुंचा नाही वैदिकांचा .. 
पुणे-महात्मा गांधी यांची  हत्या हि देशाच्या फाळणीच्या कारणाने झाल्याचा गैरसमज पसरविला गेला आहे ,मात्र खरे कारण ते नाही ,जर फाळणीच्या कारणाने गांधी हत्या झाली असती तर ,जीनांची देखील हत्या झाली असती ,पण केवळ गांधी हिंदू होते आणि हिंदू च्या हाती देशाचे नेतृत्व जाते आहे म्हणून वैदिकांनी त्यांची हत्या केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदु धर्माचे नव्हे तर वैदिक धर्माचे प्रतिनिधित्व करतो.हे येथील हिंदूंनी समजून घेतले पाहिजे असे मत  इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी येथे व्यक्त केले. ते आदिम हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या “आरएसएसचा वैदिकवाद- हिंदू एकत्रीकरणातील मुख्य अडसर” या विषयावरील पुण्यातील पत्रकार भवनात झालेल्या व्याख्यानात बोलत होते.
ते म्हणाले,’पुरुषप्रधान जन्माधारित विषमतेच्या वैदिक तत्वज्ञानाचा पुरस्कार संघ करत आला आहे. राजसत्तेवर धर्मसत्तेचे वर्चस्व असले पाहिजे हा संघ-तत्वज्ञानाचा गाभा राहिलेला आहे. संघाचा राष्ट्रवाद हा हिंदु नसून वैदिक राष्ट्रवाद आहे. हिंदुंचा धार्मिक व सांस्कृतीक इतिहास हा सर्वस्वी वेगळा राहिलेला असुन त्याचा वैदिक धर्माशी काहीही संबंध नाही. हिंदुंचा कधी ढाल तर कधी शस्त्र म्हणून वापर करत संघाने वैदिकत्व जपले आहे. हिंदुंनी संघापासुन सावध रहायला हवे
ब्रिटिशकालात वैदिक आणि हिंदु या दोन धर्मांना एकच समजण्याची गफलत झाल्याचा गैरफायदा संघाने उचलला. आर्य सिद्धांताला वैदिकांनी उचलुन धरले. रामालाही त्यांनी आर्य मानत तो दक्षीण भारतावरचा पहिला आक्रमक व वैदिक संस्कृती तेथे नेणारा म्हणून संघाने रामाला उचलुन धरले व राम मंदिराचा चर्चेने सुटु शकणारा विषय उग्र करत देशात हिंसाचाराला निमंत्रण दिले. संघप्रणित सरकार ्सत्तेत आल्यापासुन वैदिक संस्कृतीचे महात्म्य व सिंधु संस्कृती वैदिक आर्यांचीच निर्मिती आहे असे ठसवण्याचे शासकीय पातळीवर जोमाने प्रयत्न सुरु झाले. हिंदुंचा आर्थिक, सामाजिक व राजकीय इतिहास संघाच्या दृष्टीने बिनमह्त्वाचा ठरला. लोहार, वडार, सुतारांसारख्या अनेक व्यावसायिक हिंदू जातींनी साधलेल्या तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल मात्र मुग गिळून बसले. प्रत्यक्षात “वैदिकत्व” जपत “हिंदुत्व” हे नांव स्वार्थासाठी त्यांनी वापरले असेही सोनवणी म्हणाले.
वैदिक धर्मियांनी आपली पाळेमुळे शोधण्यासाठी गेली दिडशे वर्ष आटापिटा चालवला आहे. हिंदुंना संघाच्या वैदिकत्वापासुन फारकत घेत आपला राजकीय, सामाजिक व आर्थिक इतिहास स्वतंत्रपणे शोधला पाहिजे, अन्यथा वैदिकांचे फुट सोल्जर अशीच त्यांची ओळख राहील आणि न्युनगंडातच जगावे लागेल असेही सोनवणी अनेक मुद्द्यांना हात घालत म्हणाले.
सतीश पानपत्ते यांनी प्रास्ताविकात आदिम हिंदु महासंघाच्या स्थापनेमागील कालसुसंगत हिंदुहितवादी भुमिका स्पष्ट केली आणि हिंदुंना आत्मभान देण्यासाठी या संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार

ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर ...

पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली..!

प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी रशिया सोबत संबंधाची पायाभरणी...

पंतप्रधानांकडून अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त

पीएमएनआरएफमधून अनुदान जाहीर मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे ...

पुण्याचे मोहोळ जबाबदार:विमान प्रवाश्यांच्या हलाखीच्या स्थितीवर नाम फौंडेशन आणि राष्ट्रवादीच्या सोनाली देशमुख आक्रमक

परभणी:डीजीसीएने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन पत्रं पाठवली: इंडिगोला १८-२२% पायलट कमी...