मुंबई-भाजपा आणि मविआने राज्यसभा निवडणुकील काही आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा मतमोजणी लांबली आहे.भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, सुहास कांदे, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका दुसऱ्या च्या हातात दिली असा आक्षेप घेत त्यांचे मत रद्द करण्याची मागणी भाजपने केली होती. यामुळे . राज्यसभेच्या निवडणूकीची मतमोजणी लांबली आहे, मतदानावर एकमेकांकडून आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी लांबली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरकतींवर निर्णय आला नसल्याने प्रक्रियेला उशीर होत आहे. निवडणूक आयोगाला यासंबंधी ईमेल पाठवण्यात आला आहे, त्याचा निर्णय आल्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे.सहा जागांसाठीचे मतदान झाले असून, २८५ आमदारांनी मतदान केले आहे. दरम्यान यानंतर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होणार सुरू होणार होती ती आता रात्रीचे ७.५५ वाजले तरी अजूनही सुरु झाली नव्हती .
मतदान करत असताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी पोलिंग बुथवर बसलेल्या पोलिंग एजंटच्या हातात मतदान पत्रिका दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामध्ये काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नाना पटोले, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जयंत पाटील तर सुहास कांदे यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या हातात मतदान केलेली पत्रिका दिल्याचा आरोप करत भाजपने आक्षेप घेतला आहे.

