सांगली, कोल्हापुरातील आपत्ती अलमट्टी च्या हटवादी पणामुळे की प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे?

Date:

पुणे-कोल्हापूर, सांगलीत आता काय परिस्थिती आहे हे वेगळं सांगायला नको..मागील चार-पाच दिवसांपासून यासंबंधीची माहिती देणाऱ्या विभागीय आयुक्त यांच्या पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासन  काय काय करतय हे अगदी तपशीलवार सांगताहेत..म्हणजे एनडीआरएफची इतकी पथकं आहेत, इतक्या बोटी आहेत, इतके डॉक्टर आहेत, इतके अधिकारी बारकाईने लक्ष ठेऊन आहेत..आणि इतरही खूप साऱ्या बारीक-सारीक उपाययोजनांची माहिती देतात..यावरून असं जाणवतं की, प्रशासन पूरग्रस्तांसाठी खूप काही करत आहे..(प्रत्यक्षातही ते करत देखील आहेतच)..
आता प्रश्न हा उरतो की, ही सर्व यंत्रणा आधीच झटली असती तर? तर नक्कीच फरक पडला असता..प्रशासकीय यंत्रणा आता जशी कामाला लागली तशी पूर येण्याच्या आधीच कामाला लागली असती तर निदान जीवितहानी तरी टळली असती..हवामान विभागाने अतिवृष्टी होणार असल्याचे आधीच सूचितही केले होते…नियोजन करण्याची जबाबदारी होती ती प्रशासनाची..पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याला गांभीर्याने घेतले नसल्याचे आता स्पष्ट होतेय..
प्रशासन काय करू शकलं असतं..
1) प्रशासनाने लोकांना सतर्क करणं गरजेचं होतं, जे की झालं नाही..त्यामूळे लोकं आपल्या घरात अगदी निर्धास्त होती..नंतर सांगली आणि कोल्हापुरात 50 फूट पाणी साचल्यानंतरही लोकं आपल्या घरात अडकून पडली होती..दोन दिवसांनी त्यांना सरकारी मदत मिळाली..सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांची धोक्याची पाणीपातळी ही अनुक्रमे 45 आणि 43 फूट इतकी आहे. सहा दिवसांतरही आज दुपारी या शहरात 53 आणि 49 फूट पाणी होते..
2) अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वेळीच का नाही झाला? हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानंतरही नेमका किती पाऊस होणार याचा अंदाज जलसंपदा विभागाला आला नव्हता का?
3) इतका मोठा विध्वंस झाल्यानंतर अलमट्टी धरणातून पाणी सोडलं जाऊ शकतं तर तेच आधी का नाही जमलं? आधीच हा निर्णय घेतला असता तर जीवितहानी आणि वित्तहानी टळली असती? दोन तीन दिवस सलग अतिवृष्टी होत असतानाही हा निर्णय का नाही घेतला? प्रशासनाच्या हे लक्षात का नाही आले?
प्रथमदर्शनी तरी सांगली आणि कोल्हापूरातील आपत्तीला प्रशासन कारणीभूत असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे…
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...