Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सोनिया गांधींचा सरकारला प्रश्न- इंटेलिजेंस रिपोर्ट मिळाली नव्हती का?

Date:

नवी दिल्ली. चीनसोबतचा तणाव आणि गलवानमध्ये झालेल्या हिंसक मारामारीत 20 जवान शहीद झाल्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी(ता.19)पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत 20 पक्ष सहभागी झाले आहेत. बैठकीच्या सुरुवातीला सर्वांनी गलवानमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, बसपा अध्यक्ष मायावती, तृणमूल अध्यक्ष ममता बनर्जीदेखील उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीसाठी आरजेडी आणि आम आदमी पार्टीला बोलवण्यात आले नाही.

बैठकीत सोनिया गांधींनी मोदींना विचारले की, या घुसखोरीची सॅटेलाइट इमेज मिळाली नव्हती का? याबाबत इंटेलिजेंस रिपोर्ट आली नव्हती का ? सोनिया गांधी म्हणाल्या की, देशाला परिस्थिती पुर्ववत हवी आहे. माउंटेन स्ट्राइक कोरमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, याबाबत विरोधी पक्षांना माहिती मिळायला हवी.

संवेदनशील प्रकरणांचा आदर करायला हवा- शरद पवार

सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग म्हणाले की, आम्हाला पंतप्रधानांवर संपूर्ण विश्वास आहे. देशाच्या सुरक्षेखातर त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, सैनिकांनी शस्त्र चालवावे का नाही, याचा निर्णय आंतरराष्ट्री कारारानुसार होतो आणि आपल्याला अशा संवेधनशील प्रकरणांचा आदर करायला हवा.

चार क्रायटेरियांच्या आधारे पक्षांना निमंत्रण

एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनुसार, 4 क्रायटेरियाच्या आधारे ऑल पार्टी मीटिंगसाठी इनविटेशन देण्यात आले आहे. पहिला- सर्व राष्ट्रीय पक्ष. दुसरा- ज्या पक्षांचे लोकसभेत 5 खासदार आहेत. तिसरा- नॉर्थ-इस्टमधील प्रमुख पक्ष आणि चौथा- ज्या पक्षांचे नेते केंद्रीय कॅबिनेटमध्ये सामील आहेत. या आधारांवर 20 पक्षांना सामील करण्यात आले आहे.

आरजेडीने विचारले क्रायटेरिया काय आहे?

आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ट्वीट करुन विचारले की, आरजेडीचे 5 खासदार असूनही पक्षाने सर्वपक्षीय बैठकीत बोलवले का नाही ? अखेर क्रायटेरिया काय आहे ?आम आदमी पार्टी (आप) चे नेते संजय सिंह म्हणाले की, केंद्रात एक वेगळाच अहंकार असलेली सरकार बसलेली आहे. महत्वाच्या विषयावर भाजपला आपचे मत नकोय.

मागील 2 सर्व पक्षीय बैठकीत राजनाथ सिंह होते अध्यक्ष

देशाच्या सीमासुरक्षेच्या मुद्द्यावर 6 वर्षात ही तिसरी सर्व पक्षीय बैठक आहे. मागच्या वर्षी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 16 फेब्रुवारी 2019 ला सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. यापूर्वी पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतर 29 सप्टेंबर 2016 ला झाली होती. या दोन्ही बैठकींचेय अध्यक्ष तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह होते.

मोदी म्हणाले- आम्हाला शांती हवीये, पण उत्तर देण्यास सक्षम

सोमवारी(ता 15) लद्दाखच्या गलवान घाटीत चीनच्या सैनिकांच्या हल्ल्यात, भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यात चीनचेही 40 सैनिक शहीद झाले, पण चीन कबुल करत नाहीये. या घटनेच्या दोन दिवसानंतर 17 जूनला मोदी म्हणाले होते की, “आम्हाला शांती हवीये, पण कोणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही उत्तर देण्यास सक्षम आहोत. आम्हाला आमच्या शहीद जवानांवर गर्व आहे. आमच्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“त्या” विमान प्रवाश्यांना भरपाई दिलीच पाहिजे: मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मीनलवर घोषणाबाजी करत...

मद्यतस्करी :18 लाखाचा मुद्देमाल जप्त,3 गजाआड

पुणे :दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ...

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार ‘दिव्यांग भूषण 2025’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर, दि. 9 डिसेंबर 2025: महावितरणमधील दिव्यांग अधिकारी आणि...