Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

५ जूनपासून शेतीला धरणांतून पाणी देणे बंद .. उरला केवळ २० टक्के पाणीसाठा

Date:

पुणे- खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणात मिळून एकूण २०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ातील शेतीसाठी सोडण्यात येणारे आवर्तन ५ जूनपासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून  देण्यात आली. मात्र, १५ जुलैपर्यंत पाण्याबाबत विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात चारही धरणात मिळून एकूण १८.३१ टक्के पाणीसाठा होता.शहर आणि जिल्ह्य़ात गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील धरणे ९० ते ९५ टक्के भरली होती. मात्र, मे महिन्याचा अंतिम टप्पा सुरू झाल्याने काही दिवसांपासून शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी येत्या ५ जूनपासून बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, टेमघर धरणास गळती लागल्याने धरणाच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण धरणातील पाणीसाठा रिकामा करावा लागला होता. त्यामुळे वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांवरच अवलंबून राहण्याची वेळ आली. मात्र, जलसिंचन विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही शेती तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता भासलेली नाही. मुबलक पाणीसाठा असल्याने शहराला पाणी योग्य रितीने देण्यात येत आहे, अशी माहिती जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी दिली.टेमघर आणि वरसगाव धरणात पाणीसाठा शिल्लक नाही. मात्र, पानशेत धरणात ४८.४० आणि खडकवासला धरणात ३४.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण पाणीसाठा २०.०५ टक्के असून गेल्यावर्षीपेक्षा तो २.५० टक्क्यांनी जास्त आहे.मान्सूनचा अंदाज घेऊन शासनाने दिलेल्या आदेशानुसार १५ जुलैपर्यंत पाणीसाठा योग्य रितीने ठेवणे गरजेचे आहे, असेही कपोले यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...