पुणे-पिंपरी चिंचवड मध्ये सोमवारपासून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्याचा विचार:लवकरच निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

पुणे-करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचे दिसत असल्याने, आता अनेकांकडून निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जावी, अशी मागणी केली जात आहे. आम्ही त्याबाबतचा विचार करत आहोत, मुख्यमंत्री आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सोमवारी ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा विचार करीत आहोत. त्याबाबत निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

पुणे शहर आणि जिल्ह्याची करोना आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर राज्यातील एकूणच परिस्थितीची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.यावेळी अजित पवार म्हणाले की, पुण्याचा करोनाबाधित रुग्णांचा दर ३.९ टक्के इतका असून १.६ टक्के इतका मृत्यू दर आहे. त्यामुळे आपण लेव्हल तीन मध्ये येत आहोत. तसेच येत्या काळात येणार्‍या तिसर्‍या लाटेचा विचार करता, सर्व तयारी करण्यात आली आहे. मात्र तिसरी लाट येऊच नये, अशी आमच्यासह सर्वांची भावना असून मात्र तरी देखील पुढील धोके लक्षात घेऊन, प्रशासन सज्ज आहे.

ते पुढे म्हणाले की, करोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. तरी देखील मागील दरवाजाद्वारे दुपारनंतर दुकाने सुरू असतात हे सांगण्यात आले आहे. एका बाजूला रुग्ण संख्या कमी झाल्याने, व्यवहार सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आजच्या बैठकीत सर्वांनी केली आहे. या सर्व बाबींचा विचार करता, सोमवारी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ आणि हा निर्णय सकारात्मक असणार आहे. अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

पुरात अडकलेल्या नागरिकांना तांदूळ, डाळ, रॉकेल आणि शिव भोजन थाळी देणार –

राज्यातील काही भागात पूरात अडकलेल्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था व्हावी. त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्याशी बोलून, तांदूळ, डाळ, रॉकेल आणि शिव भोजन थाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

९० हजार लोकांचं स्थलांतर
यावेळी अजित पवार म्हणाले की, मागील तीन चार दिवसांत राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागात जोरदार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तर गावच्या गावं पाणी खाली गेली आहेत. त्याच दरम्यान दरड कोसळून ७६ जणांचा मृत्यू, तर ३८ जण जखमी झाल्याची घटना देखील घडली आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे. २१ एनडीआरएफ पथकं कार्यरत असून, इतर १४ पथकांमध्ये आर्मी, नेव्हीचा समावेश आहे. ५९ बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. तब्बल ९० हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात यश मिळाले आहे. तसेच आणखी बचावकार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील पालकमंत्र्यांना तिथेच थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. आम्ही देखील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जर वेळ पडल्यास आपण स्वतः सातारा येथे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डोंगराळ परिसरातील नागरिकांचे स्थलांतर –

राज्यातील दरड प्रवण क्षेत्राची राज्य शासनाकडे माहिती आहे. पण रायगड जिल्ह्यातील तळीये हा भाग हा दरड प्रवण क्षेत्रात येत नव्हता. अशी माहिती समोर आली आहे. मागील तीन चार दिवसांत दरड कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटना लक्षात घेता, पुणे जिल्ह्यातील २३ गावांमधील जे नागरिक डोंगराळ परिसरात राहत आहेत. आमचं स्थलांतरित करा, अशी मागणी करीत आहे. त्यांना कशाप्रकारे स्थलांतरित करावे, त्या दृष्टीने विचार केला जात आहे. अशी देखील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. वाई तालुक्यात कोंडविडे, मौजेघर, महाड येथील तळीये, पोलादपूरमध्ये साखर, सुतारवाडी आणि केवनाळे आणि पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली आणि ढोकवळी यासारख्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घाटातही दरडी कोसळल्या असून घाट बंद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील २३ दरडप्रवण गावांचे स्थलांतर करणार

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दरडप्रवण गावांच्या यादीत पुणे जिल्ह्यातील २३ गावांचा समावेश आहे. या गावांचे दुसरीकडे स्थलांतर करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

तळीये गाव दरडप्रवण क्षेत्रात नाही

दरवर्षी दरडप्रवण क्षेत्र गावांची माहिती घेतली जाते, त्या गावातील नागरिकांना धोक्याच्या अगोदर स्थलांतरित केले जाते. मात्र रायगडमधील तळीये गाव हे दरडप्रवण क्षेत्रात येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना सवलती देण्याचा विचार –

करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सवलत दिल्याने, ज्यांनी लस घेतली नाही ते देखील लस घेण्यास पुढे येऊ शकतील, असेही त्यांनी बोलून दाखवले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...