Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

हास्यधारांमध्ये भिजून चिंब झाले पुणेकर रसिक

Date:

पुणे-मानवी जीवनातील वास्तवावर भाष्य करतानाच राजकीय सामाजिक परिस्थितीवर
प्रकाशझोत टाकणाऱ्या हास्य कवींनी रसिकांना मनमुराद हसवतानाच विचार करायला लावणारे
संदेशही दिले. पुणे फेस्टिवलमध्ये शनिवारी हिंदी हास्य कवि संमेलन झाले. बाहेर पावसाची
रिमझिम सुरू असतानाच गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रेक्षक हास्य लहरींनी सुखावत होते.
खडकी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्षव सदस्य मनीष आनंद, सदस्य पूजा आनंद
आणि पुणे शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.याप्रसंगी दैनिक आज का आनद चे संपादक श्याम आगरवाल आणि कार्यकारी
संपादक आनंद आगरवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा व सर्व कवींचा सत्कार
पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल, डॉ, सतीश देसाई, काका धर्मावत, मोहन टिल्लू
तसेच मनीष आनंद, पूजा आनंद , संगीता तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला.
नवी दिल्लीच्या तरुण कवयित्री पद्मिनी शर्मा यांच्या सरस्वती वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ
झाला. त्यानंतर मुंबईचे महेश दुबे यांनी हास्य हा मानवी जीवनातील सर्वात सुंदर अनुभव आहे
असे सांगताना
‘हसने वाले स्वर्ग नही जाते है
वह जहॉ होते है वहा स्वर्ग बनाते है’
असे सांगून रसिकांशी संवाद साधला. जीवनात अनेक गोष्टींची कमतरता असते पण अहंकार
बाजूला ठेवला तर जीवन छान जगता येते हे त्यांनी कवितांमधून मांडले.
गजब है मेरा देश महान
यही है प्यारा हिंदुस्तान
खाने को रोटी ना मिले
मगर उडते है मंगलयान ..

या त्यांच्या कवितेने टाळ्या मिळवल्या.
पुण्याच्या मीनाक्षी भालेराव यांनी देशाची संस्कृती त्यांच्या कवितांमधून मांडली
मै राजस्थान की बेटी
मुझे महाराष्ट्र ने पाला
उठाकर चूम लेती हूँ
धरती से थोडीस मिट्टी ..
ही कविता पेश करताना इथल्या परंपरांशी महिलांचे नाते कसे आहे हे सुंदर शब्दांत मांडले.
रतलाम या छोट्याशा गावातून आलेले अशोक सुंदरानी यांनी ब्रेकिंग न्यूज आणि बातम्यांच्या
निवडीवर व्यंगात्मक बोट ठेवले. त्यांच्या निवेदनाने प्रेक्षक सुखावले. मुंबईवर हल्ला करणाऱ्या
कसाबने काय खाल्ले याची बातमी वारंवार येते पण कसाबला पकडताना छातीवर गोळ्या
झेलणाऱ्या तुकाराम ओंबाळेंना आपण विसरतो. संसदेत होणाऱ्या संघर्षाची बातमी होते पण
संसदेवरील हल्ला परतवून लावताना बलिदान करणाऱ्या कमलेशकुमारीला आपण विसरतो, हे
सांगताना त्यांनी रसिकांना विचारात पाडले.
लष्करातून निवृत्त झालेले कर्नल व्ही. पी. सिंह यांच्या जबरदस्त कविता अंगावर रोमांच उभे
करणाऱ्या होत्या.
मै भारत का एक सिपाही
यही मेरा परिचय है
जब तक ये झेंडा उंचा है
तब तक मेरा सर है ..
अये सांगताना त्यांनी शत्रूदेशाला इशाराही दिला. कर्ज काढून शस्त्रे खरेदी करणाऱ्या पाकिस्तानला
उद्देशून ते म्हणाले,
कर्ज से हिम्मत नही मिलती

और बाजारमे इज्जत नही मिलती
त्यांनी भारताची दैदीप्यमान परंपरा आणि इथल्या नामवंतांच्या नावांना एकत्र गुंफवून सादर
केलेल्या प्रदीर्घ कवितेने प्रेक्षकांना अचंबित केले.
महाआलसी या नावाने ओळखल्या जाणारे इटारसीचे राजेंद्र मालवीय यांनी पतीपत्नीच्या
रोमांचकारी आणि तितक्याच विनोदी नात्यावर सादर केलेल्या कवितांनी प्रेक्षकांना लोटपोट केले.
रुखी सुखी रोट देना
उसपर चटणी राब की
परसनेवाला ऐसी देना
जैसे कली गुलाब की..
जीवनाचे वास्तव सांगताना ते म्हणतात की
जब मेरा वक्त था
तब मेरे पास वक्त नही था
आज मेरे पास वक्त है
मगर मेरा वक्त नही है ..
पद्मिनी शर्मा यांनी तरुण प्रेक्षकांशी संवाद साधताना जोरदार टाळ्या मिळवल्या.
गम की घटा को
ऑंख का काजल बना दिया
यादोंको यु समेटा की
आचल बना दिया
जिने को और क्या चाहिये

सुद्को तुम्हारे प्यारमे
पागल बना दिया..

गेली अनेक वर्षे हिंदी हास्य कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करणारे कवी सुभाष काब्रा यांनी
वेळोवेळी सदर केलेल्या कविता आणि त्यांनी काढलेले चिमटे यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...

ध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !

7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय...