पुण्यातून मनसे च्या वतीने नागरिकांची पत्रे पंतप्रधानांना पाठविण्याची मोहीम सुरु
पुणे- पंतप्रधान साहेब , पेट्रोल ; डीझेल ,गॅॅस च्या दरवाढीने हैराण झालो हो.. अशी आर्त हाक देणारी जनतेची पत्रे आता थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम पुण्यातील मनसे ने सुरु केली आहे. सदर मोहिम पुणे शहराच्या प्रत्येक विधानसभा मतदार संघात राबवली जात आहे उपशहर अध्यक्ष राम बोरकर, हेमंत बत्ते ,प्रल्हाद गवळी विभाग अध्यक्ष सुनील कदम ,राहुल गवळी, सुधीर धावडे, आशिष देवधर शहर सचिव वसंत खुंटवड ,गणेश नायकवडे ,राजेंद्र वेडे पाटील, रमेश जाधव , विनायक कोतकर,सहित स्थानिक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.अशी माहिती मनसे चे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी येथे दिली .
अजय शिंदे असेही म्हणाले,’ गेली ८ महिने गॅस वरील सबसिडी जनतेला मिळालीच नाही आणि पेट्रोल आणि डिझेल शंभरी ला जाऊन टेकले आहे परिणामी महागाई दिवसोदिवस वाढत आहे.वाढणारी महागाई जनतेच कंबरडे मोडत आहे मात्र भाववाढ मात्र वाढतच आहे .एल पी जी च्या गॅस सिलेंडर वर मिळणारी सबसिडी ग्राहकांनच्या बँकेच्या खात्यावर जमाच झाली नाही सरकारने मे महिन्यापासून ही सबसिडी दिली नाही मोठा गाजावाजा करून उज्वला योजना सुरू करण्यात आली त्याच्या माध्यमातून गरिबांना सिलेंडर देत त्या सिलेंडर वर सबसिडी ही सुरू केली आहे आता मात्र सगळ्याच सबसिडी बंद करण्यात आल्या मुळे गॅस सिलेंडर वरील सबसिडी बंद झाल्याची चिन्ह आहेत.
याच समर्थन करताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने सबसिडी बंद केल्याने घरगुती आणि कमर्शियल सिलेंडर एकाच पातळीवर आले असल्याने काळाबाजार थांबला आहे असे जाहीर केले आहे सदर प्रकार म्हणजे निव्वळ फसवणूक आहे सांगताना उज्वला योजनेची सबसिडी बंद केली सांगायची आणि सगळ्याच सबसिड्या सरसकट बंद करायच्या असे सरकारचे धोरण आहे .
तसेच पेट्रोल आणि डिझेल च्या किमती सतत वाढत आहेत या वाढणाऱ्या किंमती मुळे महागाई वाढत आहे.त्यामुळे या भावाढीतून सरकारने सुटका करावी व गॅस सबसिडी दयावी या मागणी साठी मनसे ने पंतप्रधानाना पत्र ही मोहीम सुरू केली आहे या मोहिमे अंतर्गत आज वडगावशेरी, पर्वती या विधानसभा मतदारसंघातुन नागरिकांन कडून पत्र घेण्यात आली. असे शिंदे यांनी सांगितले .