शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि रबी हंगामासाठी बी -बियाणे देण्याची मागणी

Date:

पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
पुणे :अतिवृष्टी, महापूर आणि परतीच्या पावसाने हानी झालेल्या शेतकऱ्यांना
 नुकसानभरपाई आणि रबी हंगामासाठी बी -बियाणे देण्याची   मागणी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेने आज पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
महाराष्ट्र जोशी समाज संघटना (महाराष्ट्र राज्य ) तर्फे  नवलकिशोर राम  यांना मागण्यांचे निवेदन दिले.पुणे जिल्ह्यात व इतर ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी महापूर व परतीच्या पावसामुळे पिकांचे व मालमत्तेचे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ,जनतेला तातडीने दिलासा मिळण्याबाबत मागण्या करण्यात आल्या आहेत .
त्यावेळी  कैलास हेंद्रे(अध्यक्ष,महाराष्ट्र जोशी समाज संघटना ,महाराष्ट्र राज्य), निलेश प्रकाश निकम(उपाध्यक्ष, ,महाराष्ट्र जोशी समाज संघटना ,महाराष्ट्र राज्य) संदीप निकम (संपर्कप्रमुख, उत्तर महाराष्ट्र ),संजय गुलाब जोशी (पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख) ,   गणेश जोशी( शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड), सौ.शुभांगी (सीमा) महेश हेंद्रे,(महिला आघाडी अध्यक्ष पुणे शहर), सौ.सुरेखा निकम (महिला संघटक प्रमुख), संदेश जोशी,महेश हेंद्रे ,साहिल साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
 त्यावेळी निलेश निकम यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे, रब्बीच्या पेरणीसाठी बी-बियाणे देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच पुढील पंधरा दिवसात जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर  राज्यपालांच्या निवासस्थानी   आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे नीलेश निकम यांनी दिला .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...