कचरा प्रकल्पांच्या श्वेतपत्रिकेची मागणी ‘:कचरा परिषदेला चांगला प्रतिसाद

Date:

पुणे :पुणे शहराची कचरा समस्या ,संभाव्य उपाय ,नागरिकांचा सहभाग ,स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाचे प्रयोग  अशा अनेक पैलूंचा उहापोह करण्यासाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार करण्यासाठी ‘शिवप्रजाराज्यम संघटना’,’माय अर्थ फाउंडेशन ‘, एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया ‘ यांच्यातर्फे कचरा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .’पालिकेच्या कचरा प्रकल्पांवर  श्वेतपत्रिका  यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली तर स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल होण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आणि प्रशासन प्रामाणिकपणे कार्यरत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त  ज्ञानेश्वर मोळक  यांनी या परिषदेत सांगितले .

पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे ही परिषद  झाली .परिषदेला पुणेकर नागरिकांची  चांगली उपस्थिती होती .

       रवींद्र धारिया (अध्यक्ष ,वनराई),   ज्ञानेश्वर मोळक (सह आयुक्त , पुणे  मनपा  ),विवेक वेलणकर ( सजग नागरिक मंच ),नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे , सचिन निवंगुणे (पुणे  जिल्हा रिटेल व्यापारी संघटना ),ललित राठी (कचरा  व्यवस्थापन तज्ज्ञ ), नीलेश इनामदार ( एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया ), विलास लेले ( ग्राहक पंचायत ), अॅड. अनिरूद्ध कुलकर्णी यानी परिषदेत विचार मांडले .

‘वनराई ‘चे अध्यक्ष रवींद्र धारिया म्हणाले, ‘ कचरा समस्येचे मूळ हे स्वच्छतांच्या सवयींशीसुध्दा निगडीत आहे. हव्यासामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे. पुण्याच्या  लोकसंख्येला साजेसे कचरा व्यवस्थापन करणे आव्हानात्मक काम आहे.सर्वांच्या  प्रयत्नांनी ते शक्य आहे.त्यासाठी जनजागृती करण्याचा कचरा परिषदेच्या संयोजकांचा प्रयत्न महत्वाचा आहे . ‘

विवेक वेलणकर म्हणाले, ‘पालिकेच्या कचरा व्यवस्थापन कामाचा लेखाजोखा घेतला पाहिजे. पुणेकरांचा वचक, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर नाही.२५ हून अधिक प्रकल्प होऊनही समस्या सुटली नाही.कोटयवधी रुपये वाया गेले. या सर्व गोष्टींची श्वेतपत्रिका आणायची गरज आहे. सल्लागारांवर कोटयवधी खर्च केले जातात. जुने प्रकल्प वाऱ्यावर सोडून नवे आणले जातात. महापालिका स्वतःची जबाबदारी नागरिकांवर झटकून टाकत आहे .इंदोर चा स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक येतो ,आणि पुण्याचा येत नाही ,कारण इंदुरप्रमाणे पुण्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सकाळी रस्त्यावर कचरा व्यवस्थापनसाठी उपस्थित नसते .

पालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले. २१०० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. त्यातील १४०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.पुणे पालिका प्रामाणिकपणे कचरा समस्येवर काम करू इच्छित आहे. माझ्या कारकिर्दीत नागरिकांशी संवाद ठेऊन समस्येला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. नागरिकांची मानसिकता सकारात्मक करण्याची आवश्यकता आहे.  स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल होण्याचे प्रयत्न सुरु आहेत.ओला- सुका कचरा वर्गीकरणाची जबाबदारी नागरिक पार पाडणार की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे.

नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे ही सभागृहात उपस्थित होत्या.त्या म्हणाल्या ,’नागरिकांचा  सहभाग मिळवून सातत्याने प्रयत्न केल्याने आमच्या प्रभागात ३६ कचरापेट्या काढण्यात यश मिळाले आणि घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण होऊ लागले .ओल्या -सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण ही दैनंदिन सवय बनली पाहिजे . पालिका कर्मचाऱ्यांसमवेत मी  नगरसेवक   या नात्याने रोज सकाळी रस्त्यावर कामाची देखरेख करते . देशभरात कचरा निर्मूलनाच्या चांगल्या प्रयॊगातून नवे उपाय शिकत राहते  ‘

सचिन निवंगुणे म्हणाले, ‘ पूर्वी शहरातील कंपोस्ट झालेला कचरा शेतीसाठी नेला जायचा. प्लास्टिक हे   पुण्यातील कचऱ्यात मिसळल्याने शेतकऱ्यांनी कंपोस्ट खत म्हणून नेणे बंद केले. पुण्यात कचरा साठून राहत आहे.पन्नास मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आल्याने प्लास्टिक वाढलेच आहे. फक्त दंडात्मक कारवाईची सोय म्हणून दुकाने आणि व्यापाऱ्यांकडे पाहिले जाते.

नीलेश इनामदार म्हणाले, ‘ प्लास्टिक पासून इंधन तयार करणे शक्य आहे. घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण, विघटन करुन बागांसाठी वापरता येईल.अनेक नवी संशोधने घरच्या कचरा व्यवस्थापन करण्यासाठी   आहेत .त्याचा उपयोग केला पाहिजे .

‘कचरा आणि प्लास्टिक व्यवस्थापन करताना त्याकडे समस्या म्हणून पाहता कामा नये. सर्व समाज एकत्र येऊन मॉडेल उभे केले पाहिजे ‘ , असे विचार ललीत राठी यांनी व्यक्त केले.

प्रारंभी कचरा समस्येवर पथनाट्य सादर करण्यात आले . शेवटी कचरा व्यवस्थापन ,शहर स्वच्छतेची सामूहिक शपथ   घेण्यात आली.  परिषदेचे संयोजक अनंत घरत  यांनी प्रास्ताविक केले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...