ईव्हीएम ‘ हॅकिंग मुळे देश गिळंकृत :’ ईव्हीएम चे सत्य’ कार्यक्रमात आरोप

Date:

पुणे :’ईव्हीएम ‘ हॅकिंग मुळे देश, लोकशाही गिळंकृत झाली असल्याचा सूर ‘ ईव्हीएम चे सत्य’ कार्यक्रमात उमटला.

ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन’च्या ‘ ईव्हीएम चे सत्य’ या जाहीर कार्यक्रमास बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला.माजी न्या.बी.जी. कोळसे – पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. बुधवार,दि. ३ जुलै २०१९ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळात पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन व कलादालन, घोले रोड, पुणे येथे हा कार्यक्रम झाला.

अनुपम सराफ, विद्यूत, धनंजय शिंदे, फ़िरोज़ मिठीबोरवाला, रवि भिलाने, संतोष शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, श्वेता होनराव व्यासपीठावर उपस्थित होते.

अॅड. अभय छाजेड, दत्ता बहिरट, , रूपाली ठोंबरे-पाटील यांनी अनुभव कथन केले.प्रश्र्नोत्तरेही झाली. माहिती -तंत्रज्ञान तज्ज्ञ धनंजय माने यांनी ईव्हीएम हॅकिंग बद्दल माहितीचे सादरीकरण केले.

‘ ईव्हीएम हे उद्योगपती ,ब्राहमण वर्चस्ववादी आणि संघाने आणलेली व्यवस्था आहे. या देशात माणसं मॅनेज होतात, तर मशीन का होत नसेल ? म्हणून ईव्हीएम व्यवस्थेविरोधात लढण्याची गरज आहे ‘ , असे उद्गार न्या.बी.जी. कोळसे – पाटील यांनी काढले.

ते म्हणाले, ‘कोणतेही सरकार देशात असले तरी संघाचेच वर्चस्व राहिलेले आहे. मोदी -शहा यांच्या विरोधात न्या. कृष्णा अय्यर तसेच न्या.सावंत यांनी कारवाईची शिफारस केलेली असताना ती झाली नाही.बाबरी प्रकरण झाले नसते, तर गोध्रा झाले नसते, गोध्रा झाले नसते, तर २००२ चा हिंसाचार झाला नसता.

धनंजय शिंदे म्हणाले, ‘ईव्हीएम द्वारे मतांची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संशय असल्याने प्रगत देशातही ईव्हीएम चा वापर थांबवला आहे. पण, भारतीय निवडणूक आयोग ईव्हीएम ला चिकटून आहे.जेव्हा उमेदवाराची नावे, चिन्हे मशीनमध्ये भरली जातात, त्याच क्षणी घोटाळा केला जातो. हॅकेथॉन स्पर्धत परदेशी कंपन्यांना का प्रवेश दिला नाही ? मतदानावर आक्षेप चुकला तर मतदारालाच शिक्षा होण्याची भीती आयोगाने घातलेली आहे.
.
फिरोज मिठीबोरवाला म्हणाले, ‘ इलेक्ट्रॉनिक व्होट मॅनेजमेंटच्या जोरावर केंद्र सरकार निवडून आली आहे. सर्व यंत्रणा नियंत्रित करून १०० जागांचा घोटाळा मोदी सरकारने केला आहे. पुलवामा आणि एअर स्ट्राईकवर २३ राजकीय पक्षांना ठामपणे शंका घेता आली नाही, हे मोठे अपयश ठरले.ईव्हीएम विरोधी लढाईत देशपातळीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘

अनुपम सराफ म्हणाले, ‘ ईव्हीएम ही हातचलाखीची जादू आहे. निवडून आलेल्या उमेदवाराला मिळालेली मते ही जनतेने दिलेली मतेच आहेत, हे ठामपणे निवडणूक आयोग सांगू शकत नाही.व्हीव्हीपॅट हे व्होटर डिस्प्ले आहे, व्होटर व्हेरीफाइड स्लीप नव्हे. पाच व्हीव्ही पॅट मॅनेज करणे खूप सोपे आहे. मतदार याद्या कायद्याप्रमाणे तयार होत नाहीत. हे एक प्रकारे बूथ कॅप्चरिंग आहे.आधार नंबर व्होटरला जोडणे हाही भ्रष्टाचार आहे. जनधन खाती उघडणे हा थेट सबसिडीने प्रभावित करणे शक्य होते. सोयीचे मतदार प्रभावित करणे शक्य होते.

अभय छाजेड म्हणाले, ‘ पोलिंग एजंट, काऊटिंग एजंट ना २०१४ मeये ईव्हीएम विषयी जागरुकता नव्हती. मात्र, तेव्हापासून ईव्हीएम घोटाळा सुरु झाला होता. माझ्या निवडणुकीत उच्च न्यायालयात ईव्हीएम विरोधात धाव घेतली. मात्र, उपयोग झाला नाही.माहिती अधिकारात मशीन निर्मितीची माहिती मिळू शकत नाही. दुसरीकडे वातावरण निर्मिती केली जाते. समर्थन करणारा बुध्दीवादी वर्ग तयार ठेवला जातो. तरीही ,ईव्हीएम टॅंपरिंग कसे होते, याचा कायदेशीर शोध घेतला पाहिजे. मतदाराला आपले मत कोठे गेले, ते व्हीव्ही पॅट स्लीप द्वारे कळले पाहिजे.

रुपाली ठोंबरे – पाटील म्हणाल्या, ‘ २०१२ साली मी २१०० मतांनी निवडून आले होते. २०१७ ला १४ हजार हून अधिक मते मिळाली , पण नवख्या उमेदवाराला २५ हजार मते मिळाली. मोदी सरकार खरंच लोकप्रिय आहे तर त्यांनी बैलेट पेपरवर निवडून येऊन दाखवावे. लोकशाही जगवायची असेल तर निवडणुकांना बॅलेट पेपरवर आणावे लागेल.

दत्ता बहिरट म्हणाले, ‘ माझ्या निवडणुकीत छाननीपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव होता. मतदानावेळी मतदान भलतीकडेच जात होते. न्यायलयातही तारखा पुढे पुढे जातात. निकाल लागत नाहीत. ‘

. संतोष शिंदे म्हणाले, ‘ ईव्हीएम ऐवजी बॅलट पेपरवर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घेण्यासाठी आंदोलन झाले पाहिजे.

रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे म्हणाले, ‘ निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचे संघटन असल्याप्रमाणे वागत आहे. संसदीय लोकशाही संपण्याचा धोका आहे. ‘

रवी भिलाने म्हणाले, ‘ सर्व समाज या सरकारच्या विरोधाात आहे. फक्त, ईव्हीएम यांच्या सोबत आहे. हा देशाला गिळून टाकणारा घोटाळा आहे. त्या विरोधात उभे राहिले पाहिजे.

जांबुवंत मनोहर यांनी प्रास्ताविक केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

जाम्बुवन्त मनोहर, डॉ सुरेश बेरी, दिलिप सिंग विश्वकर्मा, रुपाली पाटील, क्षितिज यामिनी श्याम, प्रशांत कनोजिया, नागेश भोसले, समिर गांधी, सुकेश पासलकर, सुभाष कारंडे व सहकारी यांनी आयोजन केले . माजी आमदार मोहन जोशी यांनीही सभागृहात येऊन वक्त्यांची भेट घेतली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...