‘त्यांनी ‘२८८ ठिकाणी लढा देवून कॉंग्रेस आघाडीचे घेतले ४२ बळी, मात्र …

Date:

मुंबईः लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघात वंचित ने निवडणूक लढविली पण प्रत्यक्षात या बदल्यात वंचित चा असा कोणता आलेख उंचावला असा प्रश्न करत आपण विजयी होवू शकत नाही हे वंचित ला माहिती असताना या निवडणुका आजपर्यंत लढविल्या जात आहेत असे बोलले जाते आहे तर दुसरीकडे २८८पैकी ४२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षेहून अधिक यासह मिळाले आहे आणि त्यानंतर आता आपण जास्त लक्ष दिले असते तर आणखी जागा मिळवू शकलो असतो असे कॉंग्रेस नेते समजून चुकले आहेत.पण आता वेळ मात्र निघून गेली आहे . राज्यातील २८८ मतदारसंघात वंचितने उमेदवार उभे केले होते. भाजपची बी टीम असल्याचा वंचितवर आधीपासूनच आरोप केला जात आहे. परंतु, हा आरोप वंचितच्या नेत्यांनी वारंवार फेटाळून लावला आहे.
राज्यातील जवळपास ४२ जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी ५ ते १० हजार मतांच्या फरकाने पडले आहेत. तर त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मते घेतली आहेत. वंचितला मिळणारी ही सर्व मते काँग्रेस राष्ट्रवादीला मिळणारी मते असल्याचे बोलले जात आहे.आता नेमकी वंचित ला मिळणारी मते आघाडीचीच कशी असाही प्रतिप्रश्न निर्माण जरूर होईल .

पुणे कॅंटोंमेंट मध्ये भाजपच्या सुनील कांबळे ना ५२ १६० मते मिळाली तर कॉंग्रेसच्या रमेश बागवे यांना ४७ १४८ मते मिळाली आणि वंचित च्या लक्ष्मण आरडेना १० हजार २६ मते मिळाली.

राळेगाव मतदारसंघात भाजपच्या अशोक उईके यांना ९० हजार ५३० मते मिळाली. काँग्रेसच्या वसंत पुरके यांना ८० हजार ७०६ मते तर वंचितच्या माधव कोहाले यांना १० हजार ६८२ मते मिळाली.

  • पक्षीय बलाबल भाजप- १०५
    शिवसेना – ५६
    राष्ट्रवादी काँग्रेस- ५४
    काँग्रेस- ४४
    बहुजन विकास आघाडी- ३
    एमआयएम- २
    समाजवादी पार्टी- २
    प्रहार जनशक्ती पार्टी- २
    माकप- १
    जनसुराज्य शक्ती- १
    क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १
    राष्ट्रीय समाज पक्ष- १
    स्वाभिमानी पक्ष- १
    अपक्ष- १३
    एकूण जागा- २८८

चाळीसगावमध्ये भाजपच्या मंगेश चव्हाण यांना ८५ हजार २८६ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव देशमुख यांना ८१ हजार २८८ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या राकेश जाधव यांना ३८ हजार ३६१ मते मिळाली.

बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांना ६७ हजार ३८ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांना ३० हजार ८१० मते मिळाली. या ठिकाणी वंचितचे उमेदवार विजय शिंदे यांना तब्बल ४१ हजार १७३ मते मिळाली.

चिखली मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले यांना ९२ हजार ७६० मते पडली तर काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना ८६ हजार ७२ मते मिळाली. वंचितचे उमेदवार अशोक सुराडकर यांना या ठिकाणी ९ हजार ६०५ मते पडली.

सिंदखेड राजात राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ८० हजार ८०८ मते पडली. तर शिवसेनेच्या डॉ. शशिकांत खेडेकर यांना ७२ हजार ११ मते पडली. वंचितच्या सविता मुंडे यांना ३९ हजार ६१७ मते पडली.

खामगाव मतदार संघात भाजपच्या आकाश फुंडकर यांना ९० हजार १६७ मते मिळाली. तर काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांना ७३ हजार ४६४ मते मिळाली. वंचितचे उमेदवार शरद वसतकर यांना २५ हजार ८३९ मते मिळाली.

अकोटमध्ये भाजपच्या प्रकाश भारसाखळे यांना ४८ हजार २९९ मते मिळाली तर काँग्रेसच्या संजय बोडखे यांना २७ हजार ५०१ मते मिळाली. वंचितचे उमेदवार अॅड. संतोष राहाटे यांना ४१ हजार १३९ मते मिळाली.

बाळापूर मतदारसंघात शिवसेनेच्या नितीनकुमार टाले यांना ६८ हजार ९४५ मते मिळाली. वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांना ५० हजार २८४ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या संग्राम गावंडे यांना केवळ १६ हजार ३२९ मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार डॉ. रहेमान खान हाजी खान यांना ४४ हजार ३१३ मते मिळाली.

अकोला पश्चिम मध्ये भाजपच्या गोवर्धन शर्मा यांना ७२ हजार ८३८ मते मिळाली. राष्ट्रवादीचे साजीद खान यांना ७० हजार मते मिळाली. तर वंचितच्या मदन भारगड यांना २० हजार मते मिळाली.

अकोला पूर्वध्ये भाजपच्या रणधीर सावरकर यांना ९९ हजार ७५८ मते मिळाली. तर वंचितचे उमेदवार हरिदास भदे यांना ७५ हजार २६३ मते मिळाली. काँग्रेसच्या विवेक पारसकर यांना ९ हजार ४४४ मते मिळाली.

मुर्तीजापुरात भाजपच्या हरिश पिंपळे यांना ५९ हजार २४० मते मिळाली तर वंचितच्या प्रतिभा अवचार यांना ५७ हजार ३९९ मते मिळाली. वंचितच्या उमेदवाराचा या ठिकाणी दोन हजारांहून कमी मताधिक्याने पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी ४० हजार ८४९ मते मिळाली.

वाशिममध्ये भाजपच्या लखन मलिक यांना ६५ हजार ६४१ मते मिळाली तर वंचितच्या सिद्धार्थ देओले यांना ५२ हजार ५० मते मिळाली. काँग्रेसच्या रजनी राठोड यांना ३० हजार ४९३ मते मिळाली.

धामनगाव रेल्वेत भाजपच्या प्रताप अडसाड यांना ९० हजार ३९३ मते मिळाली. तर काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांना ८० हजार ९७८ मते मिळाली. वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना २३ हजार ७०० मते मिळाली.

नागपूर दक्षिणमध्ये काँग्रेसच्या गिरीश पांडव यांना ७९ हजार ८८७ मते मिळाली. भाजपच्या मोहन मते यांना ८३ हजार ८७४ मते मिळाली तर वंचितच्या रमेश पिसे यांना ५ हजार ५३५ मते मिळाली.

बल्लाळपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना ८५ हजार ६९७ मते मिळाली तर काँग्रेसच्या डॉ. विश्वास झाडे यांना ५२ हजार ६१९ मते मिळाली. वंचितच्या ३९ हजार ७७९ मते मिळाली.

चिमुरमध्ये भाजपच्या बंटी भांगडिया यांना ८६ हजार ८५२ मते मिळाली. काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांना ७७ हजार १४६ मते मिळाली तर वंचितच्या अरविंद सांडेकर यांना २४ हजार ३८४ मते मिळाली.

यवतमाळमध्ये भाजपच्या मदन येरावार यांना ७९ हजार ९१३ मते मिळाली. काँग्रेसच्या अनील मंगळुरकर यांना ७७ हजार २७८ मते मिळाली तर वंचितच्या योगश पारवेकर यांना ७ हजार ८१२ मते मिळाली.

अर्णी मतदारसंघात भाजपच्या डॉ. संदीप धुर्वे यांना ८१ हजार २४८ मते मिळाली. काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ७८ हजार ८९ मिळाली तर वंचितच्या निरंजन मसराम यांना १२ हजार २५३ मते मिळाली.

किनवटमध्ये भाजपच्या भीमराव केराम यांना ८८ हजार ९७८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप जाधव यांना ७५ हजार ८६४ मते मिळाली तर वंचितच्या प्रा. हेमराज उईके यांना ११ हजार ६३९ मते मिळाली.

नांदेड उत्तर मधून शिवसेनेचे बाजाली कल्याणकर यांना ६१ हजार ९३४ मते मिळाली. काँग्रेसच्या डीपी. सावंत यांनी ४९ हजार ९१६ मते मिळाली तर वंचितच्या मुकुंदराव चावरे यांना २६ हजार ३७६ मते मिळाली.

जिंतूरमधून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना १ लाख १६ हजार १४६ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना १ लाख १२ हजार ५९७ मते मिळाली तर वंचितच्या मनोहर वाकळे यांना १३ हजार १०७ मते मिळाली.

फुलंब्रीत भाजपच्या हरिभाऊ बागडे यांना १ लाख ५ हजार ७५५ मते मिळाली. काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांना ९० हजार ५६० तर वंचितच्या जगन्नाथ रिठे यांना १५ हजार १९९ मते मिळाली.

पैठणमध्ये शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांना ८३ हजार ६१ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय गोर्डे यांना ६८ हजार ९८७ मते तर वंचितच्या विजय चव्हाण यांना २० हजार ५६४ मते मिळाली.

उल्हासनगमध्ये भाजपच्या कुमार आयलानी यांना ४३ हजार ५७७ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना ४१ हजार ६३१ मते मिळाली तर वंचितच्या साजन सिंग यांना ५ हजार ६७७ मते मिळाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.