नागपूर – मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस असे वागत नव्हते आता उपमुख्यमंत्री असताना असे का वागत आहेत ? असा सवाल करत इडी , सीबीआय , एस आय ती , मोका चा उल्लेख करत , होय मी बदला घेतला, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही अशा विधानांचा देखील उल्लेख करत देवेन्द्रजी हे तुमच्या इमेजला शोभत नाही .कोणी काहीही म्हणू द्यात भाजपमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्रमांक १ चा नेता म्हणून फडणवीसांचेच नाव येते असे फटकारे आज विधानसभेत आपल्या १ तासाच्या भाषणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मारले ,
अजित पवार सभागृहात बोलताना म्हटले की उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, यावेळी सभागृहातून गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीपद द्यावे अशा घोषणा देण्यात आल्या. यावर अजित पवारांनी गिरीश महाजनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवण्यास पाठवायचे आहे, त्यांचे काॅन्टॅक्ट सगळीकडे आहेत, यावर सभागृहात हास्याचे कारंजे उसळले.
आता वहिनींनाच सांगतो थांबा
यापुढे बोलताना अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मी आता येऊन वहिनींनाच सागणार आहे की जरा बघाहो यांच्याकडे, त्यांनी मनावर घेतले की हे एका महिलेला मंत्री करतील. राज्यात अजून एका महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही, हा महिलांचा अपमान आहे. फडणवीस यांच्याकडे आधीच सात सात मंत्र्यांचा कारभार आहे. त्यात कोणत्याही मंत्र्याकडे काम घेऊन गेलो की फडणवीसांना विचारतो असे सांगतात, खरे म्हणजे तुम्ही मंत्री कोणालाही करा, पण मंत्रिमंडळ विस्तार करा, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
विदर्भात एखादा रिफायनरी उद्योग आणता येईलका याचा विचार करा. तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री असताना मिहानचा विकास झाला नाही. खरे तर मिहान वेगाने धावायला हवे होते. आमच्याही काळात विकास झाला नाही हे कबुल करतो. यात विदर्भाचा काय दोष. विदर्भाने आम्हालाही निवडून दिले. आमोवादग्रस्त कामात विकासकामांसाठी निधी द्या.
अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात वर्णी लागेल म्हणून अनेकांनी सुट शिवले. त्यांच्या घरचे आता विचारतात की हा सूट कधी घालणार आहे म्हणून. अनेकांचे सूट वाया चालले आहे असा टोला विस्तारासाठी उशीर लागत असल्याबद्दल लावला. गोंदीया इंदौर आणि गोंदीया हैद्राबाद ही बंद झालेली विमानसेवा सुरू करावी असे अजित पवार यांनी सांगितले. विमा कंपन्यांना वठणीवर आणण्याचे काम करा.
यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, घोषणा करताना दहादा विचार करा. आता काही काही मंत्र्यांना धीरच राहात नाही. काय बोलू आणि काय नको असे त्यांना वाटते. त्यांचा उत्साह जरा आवरा असे अजित पवारांनी म्हटले. डीएपीचा तुटवडा भरून काढण्याचे काम करा. आमच्या सरकारकडून काही चुका झाल्या तर तुम्ही दुरूस्ती करा असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
मी एखाद्याला चॅलेंज केलेना तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. सरकार आल्यानंतर तुम्ही संधी दिलेले एक नेते बारामतीत आले. बारामतीत घड्याळ बंद करण्याचा “करेक्ट’ कार्यक्रम करू असे ते म्हणाले. आता मी मनावर घेतलेना तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. जरा सबुरीने घ्या म्हणाव. खूपच स्पीडने चालले ते, असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे. विधानसभेत नियम 293 अन्वये सुरू केलेल्या चर्चेत बोलताना केले. अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली.
अक्षरश: तळतळाट लागेल तुम्हाला!
आपल्या दोघांचे, तर चांगलं चाललं आहे. देवेंद्रजींना विचारलं की, मुख्यमंत्र्यांची संमती आणा आणि त्यांना विचारलं की ते म्हणतात देवेंद्रजींनी म्हटल्यास मी केलं. ही टोलवाटोलवी सुरु आहे. दादा तुमची मला इतकी कधी कधी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती, तर अशी टोलवाटोलवी केली नसती. कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला केवळ एक दोन साधी विभाग देऊन बाजूला ठेवलं आहेय आणि स्वत: महत्वाची सहा सहा विभाग घेतले आणि या पद्धतीचे राजकारण करता? बरोबर अक्षरश: तळतळाट लागेल तुम्हाला.