पुणे- येत्या 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी दोन ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांमध्ये रस्सीखेच होत आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल अशी त्यांची नावे आहेत . तर, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्याही नावाचा विचारही पक्षाच्या पातळीवर सुरू असल्याचे वृत्त आहे.
माजी राज्यमंत्री असलेल्या रमेश बागवे यांनीही पक्षाची धोरणे सामान्यां पर्यंत पोहोचविण्यास आणि त्यातून बांधणी करण्यावर कायम भर दिला आहे.रमेश बागवे यांनी पक्षाच्या पडत्या काळात पक्षाला संजीवनी देण्याचे काम केले आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या सत्ता काळात कॉंग्रेस भवनला सदैव आक्रमकतेने कार्यरत ठेवणारा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजप विरोधात त्यांनी जेवढा आंदोलनाचा धडाका लावला तेवढा आजपर्यंत कोणीही लावला नाही . माजी गृहराज्यमंत्री असताना त्यांनी आर आर पाटील यांच्या सोबत काम केले .त्यांच्याच काळात कसाब ला फाशी दिली गेली .दलित मातंग समाजाचे बलशाली नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आहे. बागवे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कॅन्टोन्मेंट मतदारसंघात अतिशय कमी मतांनी पराभव झाला. ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधून काही जन भाजपवासी झाले. त्यांनी कॉंग्रेस विरोधी प्रचार करून दगलबाजी केली .आणि अगदी मिळणारा विजय बागवे यांच्या हातून अत्यंत अल्प मतांनी निसटला . कॉंग्रेस मध्ये फार पूर्वीपासून फार जन आहेत . हे सारे निष्ठावंत देखील सद्य स्थितीत बागवे आणि त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे यांना कॉंग्रेसच्या शहरातील बलस्थानांमध्ये वरचा क्रमांक देतात .
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये ज्यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो आणि ज्यांना सातत्याने आमदारकी हुलकावणी देण्यात आली असे आबा बागुल हे मागील 30 वर्षांपासून पुणे महापालिकेचे नगरसेवक आहेत.पुण्यातून ज्येष्ठ नागरिकांना काशीयात्रा घडविणारा आधुनिक श्रावण बाळ, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक आणि अभ्यासू भाषणे करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ गेल्या 25 वर्षांपासून आरक्षित होता. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविता आली नाही.अनेकदा त्यांची आमदारकीची संधी हुकली यावेळी राष्ट्रवादीला पर्वती मतदार संघ देण्यात आल्याने त्यांना रिंगणात उतरल्यावर माघार घ्यावी लागली .बागुल यांनी विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीकडे कळविले आहे. त्यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणेही झाले आहे असे सांगण्यात येवू लागले आहे. .येत्या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे 5, तर भाजपचे 4 सदस्य विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात. सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २१ मे रोजी 9 जागांसाठी मतदान होणार आहे.
त्यासाठी ४ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, १२ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून १४ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २१ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.