नवी दिल्ली -काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही राफेलच्या आगमनाबद्दल भारतीय वायूसेनेचं अभिनंदन केलंय.
मात्र, त्यासोबतच केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय वायू दलाचं अभिनंदन करत, मोदी सरकारला ३ प्रश्न विचारले आहेत. भारत सरकार या प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल का, असे राहुल यांनी म्हटलंय.
526 कोटी रुपयांचं राफेल विमान 1670 कोटी रुपयांना का खरेदी केलं?
126 ऐवजी केवळ 36 राफेल विमानंच का खरेदी करण्यात येत आहेत?
HAL ऐवजी दिवाळखोर अनिल यांस 30 हजार कोटींचं कॉन्ट्रॅक्ट का देण्यात आलंय?
असे तीन प्रश्न राहुल गांधींनी विचारले आहेत. राफेल खरेदीवरुन यापूर्वीही काँग्रेसने मोदी सरकारला संसंदेत प्रश्न विचारले होते. तसेच, या खेरदीत मोठा घोटाळा असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता.