राज्यभरात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का देत 9 पैकी 6 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही काही ठिकणी गुलाल उढळला आहे. ठाणे, बीड, बुलढाणा, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत मनसेने काबीज केली आहे.
चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या गावातील खानापूर ग्रामपंचायत गमवावी लागली आहे. दरम्यान, एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. प्रसार माध्यमांशी बातचीतमध्ये पाटील म्हणाले की, खानापूरमध्ये 6 पैकी 3 जागा आम्ही जिंकल्या आहेत. दोन जागांवर कमी मताने आम्ही पराभूत झालो आहे. पण तरीही गावाने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असे पाटील म्हणाले.
मनसेने उधळला गुलाल
अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीवर मनसेने शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारत आपला झेंडा फडकावला आहे. यात मनसेने 7 पैकी 4 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, बीड जिल्ह्यातील केजच्या नारेवाडी ग्रामपंचायतीवरही मनसेने झेंडा फडकावत सात पैकी पाच जागांवर विजय मिळवला आहे. तिकडे, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील शिरसाठवाडी ग्रामपंचायतही मनसेच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागा मनसेच्या अविनाश पालवे पॅनेलने जिंकल्या आहेत. याशिवाय, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायतीमध्ये मनसेचा मोठा विजय झाला आहे. पक्षाने 9 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे.