मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभयंतांनी जवळपास दीड तास राज्यातील विविध कळीच्या मुद्यांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर दोघांत खलबते झाल्याची माहिती आहे.
राज ठाकरेंच्या सभेच्या संदर्भात चर्चा
राज ठाकरेंनी भोंगे काढण्यासंदर्भात 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. यातच त्यांची औरंगाबादेत 1 मे रोजी सभा आहे. या सभेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यावर काय तोडगा काढता येईल या विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली आहे.