नवी दिल्ली – “तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी शेतकर्यांचा अपमान करून त्यांना दहशतवादी, देशद्रोही, गुंड, बदमाश असे म्हटले, आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला, त्यांना अटक करण्यात आली. आता निवडणुकीतील पराभव दिसू लागले, तेव्हा अचानक तुम्हाला या देशाचे सत्य समजू लागले. तुमच्या नशिबावर आणि तुमच्या बदलत्या वृत्तीवर विश्वास ठेवणे कठीण आहे.” अशी सडसडीत टीका प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.केंद्र सरकारने लागू केलेल्या तीनही कृषी कायद्यांना रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते. आज सकाळी नऊ वाजता देशाला संबोधित करत कृषी कायदे मागे घेत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.पुढे प्रियंका म्हणाल्या की, शेतकरी आंदोलनादरम्यान 600 पेक्षाही अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, सुमारे 350 दिवसांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी संघर्ष केला. त्याची किंचितही काळजी तुम्हाला नव्हती. तुमच्याच सरकारमध्यला एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली, त्या अपघातात सर्वासमोर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तुमच्या पक्षातील नेत्यांनी शेतकऱ्यांचे अपमान केले असून, त्यांना दहशतवादी, देशद्रोही, गुंड, उपद्रवी असे म्हटले होते, आणि तुम्ही स्वत: शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हटले होते. त्यांच्यावर लाठ्या-काठ्याने वार करण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली. असे प्रियंका गांधी म्हणाल्या.