चेन्नई(तमिळनाडू)- सुपरस्टार रजनीकांतने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकार्या निर्णयाचे स्वागत केले. रजनीकांतने रविवारी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या. त्यानी मोदी-शाह यांना कृष्ण-अर्जुनची जोडी असल्याचे म्हटले.मात्र यातील कृष्ण कोण आणि अर्जुन कोण हे मात्र त्यांना च ठावूक आहे अशीही टिप्पणी करून रजनीकांतने काश्मीरवर सरकारच्या निर्णयाला मिशन काश्मीर असे संबोधले. रजनीकांत उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. रजनी यांनी संसदेतील अमित शाहंच्या भाषणाचे कौतुकही केले आणि म्हणाले की, आता लोकांना कळेल कोण आहे अमित शाह.