आमदाराच्याच प्लाॅटवर म्हणे गुंडांचा ताबा ..बोला आता .. सामन्यांचे काय ?
मुंबई : असे अनेक आमदार पाहिलेत, असे उत्तर एखादा पोलिस अधिकारी थेट आमदाराला देऊ शकतो? पण असे पुण्यात भाजप आमदारासोबत घडल्याचे आज विधानसभेत स्पष्ट झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहखात्यावर बोलताना खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांचीच फिर्याद पोलिस घेत नव्हते, असा आरोप केला. हे कुठले गुंडाराज आहे, असा सवाल त्यांनी केला.पोलिस खात्याच्या ढासळत्या प्रतिमेबद्दल बोलताना फडणवीस यांनी भीमराव तापकीर यांच्याबाबतचा अनुभव सांगितला. तापकीर यांच्या निवासस्थानाशेजारील असलेल्या त्यांच्या प्लाॅटवर बेकायदा ताबा मारण्यात आला. तापकीर याबाबत पोलिस तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची दखल घेण्यात आली नाही. उलट असे अनेक आमदार पाहिलेत, असे उत्तर त्यांना देण्यात आले. याबाबत तापकीर यांनी वरिष्ठांकडे दखल घेण्याची विनंती केली. तेथेही त्यांच्या पदरी निराशा आली. शेवटी मला पोलिस आयुक्तांशी बोलावे लागले. तेव्हा तापकीर यांच्यासाठी पोलिस धावून आले, असा किस्सा फडणवीस यांनी सांगितले. एखाद्या आमदाराला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसांचे काय, असे त्यांनी विचारले.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :
➡️ भीमराव तापकीर यांच्या जागेवर अवैध कब्जा गुंडांनी केला आणि ते तक्रार करायला गेले तर असे आमदार खूप पाहिले,असे उत्तर दिले गेले.
आमदारांची ही गत असेल तर सामान्य जनतेचे काय हाल.
➡️ अमरावती येथील दंगल हा एक प्रयोग!
फेक न्युजची फॅक्टरी चालविली गेली.
पाकिस्तानातील फोटो हे त्रिपुरातील भासविण्यात आले.
एक राष्ट्रीय नेता ट्विट करतो आणि कुठलेही नियोजन नसताना 40 हजार लोक रस्त्यावर येतात. हा संयोग असूच शकत नाही.
➡️ दुसऱ्या दिवशी काही प्रतिक्रिया आली,तर पहिल्या दिवशीची घटना डीलिट आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनेवर कारवाई.
जाणीवपूर्वक नाव लिहून भाजपा,अभाविप कार्यकर्त्यांवर कारवाई.
रझा अकादमीवर कारवाई करणार आहे की नाही.
➡️ पोलिस दल सुधारले नाही, तर जगातील सर्वोत्तम पोलिस दलाची बदनामी होईल.
माझ्याकडे काही गोपनीय माहिती आली तर जनतेच्या हितासाठी मांडणे हे विरोधी पक्षनेता म्हणून माझे काम आहे. हा अहवाल मी फोडला नाही, तर तो केंद्रीय गृह सचिवांना दिला.
मविआ नेत्यांनीच तो अहवाल फोडला.
➡️ ज्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली,आज त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे.
खरोखर हा संपूर्ण घटनाक्रम दुर्दैवी आहे.
➡️ महिला अत्याचाराने तर राज्यात सीमा गाठली आहे. जोवर राज्य सरकार लक्ष घालणार नाही,तोवर स्थिती नियंत्रणात येणार नाही.
मनोधैर्य योजनेचा बोजवारा उडाला आहे.
➡️ राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटेसोबत परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाईंड डॉ. प्रीतीश देशमुख हा ५ लाखांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीला देतो.कुणाकुणासोबत त्याचे फोटो?
त्याची ट्विटर टाईमलाईन का डीलिट केली गेली.
➡️ ग्रामविकास विभागात १५०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते.
१० वर्ष वा जोवर देशात GST आहे,त्या कालावधीसाठी.
असे कंत्राट देशात कधी पाहिले का?
साऱ्या ग्रामपंचायती नकार देत असताना हे करण्यात आले. अखेर तक्रार झाल्यावर ते रद्द करण्यात आले.
➡️ असे टेंडर काढतात कोण? याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे.
शिवभोजन योजनेत मोठा भ्रष्टाचार.दोन घोट ज्यूस देऊन बालकांचे फोटो काढले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे योजनेत सुद्धा हा प्रकार. फारच दुर्दैवी आहे.
➡️ सरकारकडून स्वस्तात जमीन आणि त्याचा मोबदला सुद्धा!
कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे प्रकरण गंभीर आहे.चार पट मोबदला सरकारच्याच जमीनीवर घ्यायचा,हा तर चांगला गोरखधंदा आहे.
➡️ संभाजीनगरमध्ये सिल्लोडमध्ये एकदम 6 कॉलेजसाठी राज्य सरकारकडून लेटर ऑफ इंटेट एका मंत्र्यांच्या संस्थेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रतिकूल मत दिलेले असताना सुद्धा.प्रकरण उच्च न्यायालयात गेले.कोर्टाने काय सांगितले, ‘आर्बिटरी एक्सरसाईज ऑफ पॉवर’.
➡️ दिवंगत शिक्षकाची बदली आणि वर्षभरापूर्वी निवृत्ती काय चालले आहे राज्यात.कुणाचा पायपोस नाही.
प्रशासनाचा पूर्ण खेळ मांडला आहे.
➡️ कोरोना कुठे कुठे होतो?
- मंदिरात
- मंत्रिमंडळ बैठकीत
- मंत्रालयात
- अधिवेशनात
- लॉकडाऊन लावताना
- पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी न करण्यासाठी कोरोना
- शेतकर्यांना मदत न करण्यासाठी कोरोना
- कोणत्याही घटकाला मदत नाही, कारण कोरोना
- विकासाच्या प्रत्येक कामात कोरोना.
➡️ कोरोना कुठे जात नाही?
- नेत्यांकडील लग्नात
- सत्ताधारी पक्षांच्या आंदोलनांमध्ये
- काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कुठल्याही बैठकांमध्ये.
➡️ भ्रष्टाचाराचा कळस
- 18 रुपयांचा मास्क 370 रुपयांत खरेदी
- 400 रुपयांची पीपीई कीट 2000 रुपयांत
- 5 लाखांचे व्हेंटिलेटर 18 लाखांत
- कोविड सेंटर निर्मितीत गाद्या, पंखे, औषधी खरेदीत इतका भ्रष्टाचार की विचारता सोय नाही
- नवीन वस्तु खरेदीच्या किंमतीपेक्षा भाडे अधिक.
➡️ एप्रिल 2020 : 40,671 मृत्यू
एप्रिल 2021 : 84,262 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 14,164)
मे 2020 : 52,596 मृत्यू
मे 2021 : 1,22,084 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 26,031)
जून 2020 : 68,852 मृत्यू
जून 2021 : 88,812 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 27,101).
➡️ 2021 मधील 6 घटना : 75 हून अधिक मृत्यू
9 जानेवारी 2021 : भंडारा (10 बालकांचा मृत्यू)
11 मार्च 2021 : 11 मृत्यू
21 एप्रिल 2021 : नाशिक ऑक्सिजन गळती (24 मृत्यू)
23 एप्रिल 2021 : विरार आयसीयू आग (15 मृत्यू)
28 एप्रिल 2021 : मुंब्रा आगीत (4 मृत्यू)
6 नोव्हेंबर 2021 : नगर 11 मृत्यू.
➡️ पीएम केअर्सला नावं ठेवणार्यांनी काय केलं?
पीएम केअर्समध्ये प्राप्त निधी: 3076 कोटी (आर्थिक वर्ष – 2019-20)
पीएम केअर्समधून मंजूर निधी: 3100 कोटी (यातील 1000 कोटी राज्यांना)
सीएम रिलिफ फंड : 799 कोटी रूपये
सीएम फंडातून दिले : 192 कोटी रूपये (24 टक्के).