आता घरोघरी नळाने येणारा पाण्याचा थेंब हि घ्यावा लागेल विकत – प्रारंभ झाला १२ मीटर बसवून

Date:

  पुणे-जीएसटी ,हेल्मेट सक्ती , बेरोजगारी, महागाई … याने हैराण झालेल्या पुणेकरांनो सांभाळा … आता तुम्हाला घरात नळाने येणाऱ्या पाण्याच्या थेंबालाही पैसे मोजावे लागणार आहेत .ज्याचा प्रारंभ नुकताच गाजावाजा न करता १२ मीटर बसवून करण्यात आला आहे .समान पाणीपुरवठा योजनेच्या नावाने ..खऱ्या अर्थाने सर्वत्र समान पाणी पुरवठा होणार नसून ,जेवढे पैसे तेवढे पाणी या अर्थाने हा पाणीपुरवठा होणार आहे हे सर्वप्रथम पुणेकरांनो लक्षात घ्या .  आणि विशेष म्हणजे हा ऑगस्ट २०१६ चाच प्रस्ताव आहे जो आता मार्गी लागतो आहे.     

पाण्याचे मीटर (ऑटोमॅटिक मीटर रिडिंग) बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. औंध येथील सारस्वत बँकेच्या पाणीजोडणीला मीटर बसविण्यात आले आहेत. आतापर्यंत १२ मीटर बसविण्यात आले असून, आणखी ५० मीटर या परिसरात बसविण्यात येणार आहे. विमाननगरमध्येही मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. समान पाणी पुरवठा योजनेतील बहुचर्चित मीटर बसविण्यास सुरुवात झाल्याने वापर होणाऱ्या प्रत्येक थेंबाचे ‘ऑडिट’ होणार आहे.

औंध-बाणेर-बालेवाडी येथे रस्त्यांची कामे करताना स्मार्ट सिटी कंपनीने समान पाणीपुरवठा योजनेनुसार पाइप टाकण्याची कामे सुरू केली आहेत. ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर आणि जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यासाठी पालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार कंपन्यांची मदत घेण्यात येत आहे. त्यानुसार सारस्वत बँकेच्या पाणीजोडाला मीटर बसविण्यात आले आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम झाले की, लगेचच व्यावसायिक नळजोडांना मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून रस्ता खोदाईला विलंब होत असला, तरी या खोदाई करण्यात येणार आहे. नगर रस्ता, विमाननगर परिसरात खोदाईची कामे हाती घेण्यात येणार आहेत. योजनेच्या कामाचे कार्यादेश देऊन आठ महिने उलटले तरी कामास सुरुवात न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ठेकेदार कंपन्यांकडून सर्वेक्षण सुरू असल्याचा दावा पालिका प्रशासन करत असले, तरी हे काम सुरू न करण्यास आतल्या गोटातील हालचाली कारणीभूत असल्याची चर्चाही होती.

स्मार्ट सिटी कंपनीने औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात पाणी आणि ड्रेनेज लाइन बदलण्याची कामे हाती घेतली आहेत. नव्या जलवाहिनी समान पाणीपुरवठा योजनेंर्तगत टाकण्यात येत आहेत. त्यामुळे या परिसरात मीटर बसविण्याच्या कामास पुढील काळात वेग येईल, असे चित्र आहे. प्रशासनाकडून सुरुवातीला व्यावसायिक नळजोडांना मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर घरगुती (सोसायट्यांना) मीटर बसविण्यास सुरुवात होणारआहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...