पुणे- फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच पुण्यातील पूर्व भागाला पिण्याच्या पाण्याची चणचण भासू लागली आहे . भरपूर पाऊस झालाय चिंता करायची गरज नाही .. अशा समजूती ला काल मुख्य सभेत झालेल्या पाण्यासाठी च्या आरडा ओरड्याने धक्का बसला आहे . तर त्याहून मोठा धक्का काल मुख्य सभेत पाणीपुरवठा प्रमुख व्ही जी कुलकर्णी यांनी दिलेल्या कबुलीने बसला आहे . जोपर्यंत भामा आसखेड ची योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत हडपसर आणि पूर्वेचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार नाही असेच त्यांनी स्पष्ट केले आहे .
तर नाना भानगिरे , योगेश ससाणे , सुभाष जगताप ,चेतन तुपे पाटील यांनी या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरले .. पण उपाय मात्र निघाला नाही .. पहा नेमके काय झाले …
तोपर्यंत पुण्याची पूर्व तहानलेली राहील ..पाणीपुरवठाप्रमुखांची स्पष्टोक्ती
Date:

