पुणे- महापौर बंगल्यावर भाजपा नगरसेवकांच्या बैठकीचे राजकारण करून विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मुख्य सभेत गोंधळ घालून चर्चा टाळल्याचा आरोप महापौर मुक्त टिळक ,तसेच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना केला .
महापौर टिळक म्हणाल्या सायकल योजनेवर आम्हाला चर्चा घडवून आणून नगरसेवकांचे मत जाणून घेण्याची इच्छा होती . पण विरोधकांनी महापौर बंगल्यावरील बैठकीचे राजकारण केले आणि गोंधळ घालून चर्चा होऊ दिली नाही . वास्तविक पाहता त्यांनी कालच्या बैठकीचे जे राजकारण चालविले आहे तशा बैठका अजित पवार यांनी हि पालकमंत्री असताना घेतलेल्या आहेत आणि आपण सभागृहात सायकल योजनेचे प्रेझेन्टेशन करण्यास तयार होतो तसेच आबा बागुल यांचे हि नाव चर्चेसाठी पुकारले होते . पण अंतर्गत राजकारणामुळे हि चर्चा उधळून लावण्यात आली .