महापालिका दिवाळखोरीत – आबा बागुल आणि सुभाष जगतापांनी आयुक्तांच्या स्पष्टीकरणावर खेचले कान… Live vedio

Date:

पुणे-महापालिकेने या वर्षीचा अर्थसंकल्प ८ हजार कोटींपेक्षाही अधिकचा सादर केला आहे़ पण आयुक्तांनी केवळ साडेपाच हजार कोटी रूपये जमा होतील व महसुली खर्च मात्र महागाई आणि पगारवाढ यामुळे 650 कोटीने आसमानी पोहोचुन ४ हजार ३०० कोटी रूपये होतअसल्याचे सांगितले. त्यामुळे कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या सत्ताधारी पक्षाने आत्ता तरी महापालिका दिवाळखोरीत चालली आहे हे कबूल करावे, असे सुभाष जगताप यांनी सांगितले़ तर महापालिका कररूपी पैसा केवळ महसुली कामांवरच खर्च करणार का, शहरातील गल्लीबोळातील विकास थांबवला आहे़ पैसे नसताना विविध कामांच्या निविदा काढण्यात सत्ताधारी रस दाखवत आहेत़ असे विविध आरोप या वेळी आबा बागुल, , अरविंद शिंदे, प्रशांत जगताप ,अविनाश बागवे ,पृथ्वीराज सुतार यांनी करून सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला धारेवर धरले़. दरम्यान सभागृह नेते गणेश बिडकर यांनी गेल्या दीड वर्षात कोरोना महामारी ची कारणे मीमांसा देत याही काळात पुणेकर आणि महापालिकेने मिळकत कर रूपाने पालिकेला बळ दिल्याचे श्रेय मात्र दिले.राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूर पठाण यांनी त्यांच्या प्रभागतिल सिव्हिक कल्चरल सेंटर साठी आक्रमक पवित्रा घेत हा विषय मंजूर करवून घेतला.

नेमके आयुक्तांचे स्पष्टीकरण काय ?
या वर्षी केवळ साडेपाच हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित : आयुक्त

वित्तीय समितीवरून उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना आयुक्त विक्रम कुमार यांनी, या वर्षी पुणे महापालिकेला जास्तीत जास्त साडेपाच हजार कोटींचे उत्पन्न मिळेल अशी शक्यता वर्तविली़ या उत्पन्नातून सातवा वेतन आयोगाचा खर्च, भांडवली खर्च व आदी महसूल खर्च हा साधारणत: ४ हजार ३०० कोटी राहणार असून, महापालिकेकडे केवळ १ हजार २०० कोटी रुपयेच उरतील असे स्पष्ट केले़

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी लॉकडाऊनमध्ये १ जूनपासून शिथिलता देण्यात आली असली तरी अद्यापही सर्व व्यवहार पूर्ववत झालेले नाहीत़ त्यातच तिसरी लाट आली तर ती किती भयंकर असेल याचा अंदाजही नाही़ असे असताना सर्वसाधारण सभेनेच मिळकतकरात १५ टक्के सवलत दिल्याने मिळकतकराचे उत्पन्नही घटले आहे़ ७ व्या वेतन आयोगाचा ६५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाढणार आहे़ डिझेल, पेट्रोल व वीजदरवाढ यामुळे खर्चात मोठी वाढ होणार आहे़ याकडे लक्ष वेधून विक्रम कुमार यांनी, महापालिकेला येणारे उत्पन्न व होणारा खर्च याचा ताळमेळ बसावा याकरिताच हे नियोजन केले असल्याचे सांगितले़
महापालिकेकडे पैसे नसल्याने जमा व खर्चांचा ताळमेळ बसावा म्हणून, नगरसेवकांच्या ‘स’ यादीसह अन्य विकासकामांना कात्री लावणाऱ्या महापालिका आयुक्तांनी वित्तीय समितीची स्थापना केली़ मात्र या समितीला सर्वच सदस्यांनी हरकत घेतल्याने, शुक्रवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वित्तीय समितीबाबत पुनर्विचार करावा व याकरिता सर्व गटनेते, पक्षनेते, विविध समित्यांची बैठक बोलविण्याची सूचनाही प्रशासनाला केली़

कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न कमी झाले आहे़ यामुळे अनावश्यक कामांना कात्री लावण्यासाठी नगरसेवकांनी सुचविलेली अनेक कामे सध्या वित्तीय समितीकडून नाकारली जात आहे़ यामुळे आज चौदा महिन्यांनंतर झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी या वित्तीय समितीवर हरकत घेतली़ सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही या समितीमुळे त्रस्त झाले असून, आपल्या प्रभागात नगरसेवकांनी कामे करायची की नाही़ केवळ नगरसेवकांच्या ‘स’यादीला प्रशासन कात्री लावणार का, महसुली खर्च हजारो कोटींमध्ये आहे, त्याला का कात्री लावत नाही, अशा नानाविध प्रश्नांनी नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षाला जाब विचारला़ यामुळे अखेर आयुक्तांच्या निवेदनानंतर महापौर मोहोळ यांनी आयुक्तांना या समितीबाबत पुनर्विचार करण्याची सूचना केली़
तोंड बघून 20/30 आणि 100 टक्के नको, सर्व नगरसेवकांच्या वॉर्ड मध्ये समान रक्कम विकास कामे करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी,यात लॉबी करू नये अशी मागणी विशाल धनवडे यांनी केली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...