गेल्या 40 वर्षांतील हे सर्वात मोठे यश – खासदार काकडे

Date:

पुणे, दि. 27 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर, राज्यातील जनतेने आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे मताधिक्य दिले. हा अपेक्षेप्रमाणेच महाजनादेश मिळाला असून 164 जागा लढवून 106 जागा जिंकलेल्या भाजपाचे हे यश 70 टक्के आहे. गेल्या 40 वर्षांत कोणत्याही पक्षाला भाजपासारखे याप्रमाणात इतके मोठे यश मिळालेले नाही, असे रोखठोक मत खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे.
भाजप व शिवसेनेला मिळालेला कौल आणि सरकार स्थापनेसंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार संजय काकडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,  विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना व मित्र पक्ष महायुतीला सत्तेत बसण्यासाठी कौल दिला आहे. शरद पवार व काँग्रेसच्या नेत्यांनी ते विरोधात बसणार म्हणून जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे हे चाणाक्ष असून सध्या ते जादा मंत्रिपदं मिळावीत म्हणून बार्गेनिंगसाठी बोलत असावेत. राष्ट्रवादी व काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांना पिंजऱ्यातून नेले. हे शिवसैनिक अजून विसरला नाही आणि बाळासाहेबांना पिंजऱ्यातून नेणाऱ्यांसोबत जाणे हे कडवट शिवसैनिकांना कदापि आवडणार नाही. याची पूर्ण कल्पना उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे शिवसेना सरकारमध्ये निश्चितपणे सहभागी होईल, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.
1995 ला शिवसेनेला 73 व भाजपला 65 जागा मिळालेल्या असताना शिवसेनेने भाजपाला मुख्यमंत्रीपद दिले नव्हते. त्या तुलनेत आताच्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाला 106 जागा मिळाल्यात व 19 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे फार न ताणता शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सहभागी होईल. आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.
निवडणूक लढवित असताना प्रत्येक पक्ष मोठं लक्ष्य ठेवत असतो. आणि निवडणुकीचा निकाल पाहिला तर, गेल्या 40 वर्षांत कोणत्याही पक्षाला मिळाले नाही इतकं चांगलं यश भाजपाला मिळाले आहे. 1999 पासून ते आतापर्यंतच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीलाही 82 पेक्षा अधिक जागा मिळालेल्या नाहीत. त्याउलट या निवडणुकीत 164 जागा लढवून भाजपा व मित्र पक्षाला 106 जागा मिळाल्या. 19 अपक्षांनी पाठिंबा दिल्याने 2014 च्या संख्येइतकं संख्याबळ भाजपाचे आहे, असेही खासदार काकडे म्हणाले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...