सीएम कडून काकडेंना शाब्बासकी !

Date:

पुणे : खासदार संजय काकडे यांनी भाजपामध्ये केलेलं ‘इनकमिंग’ भाजपाच्या शिवाजीनगर, कोथरुड आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील विजयामध्ये अतिशय महत्वपूर्ण ठरले. या तीनही मतदार संघातील भाजपाच्या उमेदवारांचा त्यामुळे विजय सोपा झाल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले. खासदार काकडेंच्या या महत्वपूर्ण कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांना शाब्बासकी दिली.

विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल खासदार संजय काकडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईमध्ये भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल खासदार काकडे यांनी दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्ह्यातील निकालाबाबत त्यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवारांचे घटलेले मताधिक्य, चार आमदारांचा झालेला पराभव आणि पुढील काळात करावयाची कामे यासंदर्भात ही चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार काकडे यांनाच शाब्बासकी देत त्यांनी पुण्यातील तीन मतदार संघात केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर खासदार संजय काकडे यांनी अतिशय महत्वाच्या क्षणी कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात इतर पक्षातील स्थानिक तगड्या नेत्यांचे इनकमिंग घडवून आणले. त्यांचा भाजपातील पक्ष प्रवेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थित घडवून आणला. पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक तुकाराम जाधव, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश होता. यामुळे कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील भाजपची ताकद वाढली. आणि यामुळे या मतदार संघातील भाजपाच्या उमेदवारांचा विजय सोपा झाल्याची चर्चा सर्वदूर होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीतही खासदार संजय काकडे यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविली होती. त्यावेळी खासदार संजय काकडे यांनी ताकदीचे स्थानिक नेते भाजपची ताकद नसलेल्या ठिकाणी आणले आणि दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आणि त्याचीच पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात पाहायला मिळाली. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासतला माणूस आणि जबाबदारी टाकली की ती फत्ते करणारा माणूस म्हणून खासदार काकडेंची ओळख निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे जिल्ह्यातील १७ नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.