पुणे-दि मुस्लिम वेल्फअर ट्रस्टच्यावतीने आषाढी वारीमधील वारकरी बांधव व मुस्लिम बांधवानी एकत्रित येऊन गणेश पेठमधील समर्थ व्यायाम मंदिरात रोझा इफ्तार कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी वारकरी बांधवानी मुस्लिम बांधवाना खजूर देउन उपास सोडविला तर वारकरी बांधवाना फलाआहार देण्यात आला. यावेळी ऍड. ए. रेहमान , अमानुल्ला खान , मुस्ताक पटेल , नुरमोहम्म्द तांबे , इकबाल दरबार , डॉ. मिलिंद भोई , अहमद चमडेवाले , मुख्तार पटेल , अमानत शेख , हाशमी सौदागर , महेंद्र आगरवाल , अन्वर पटेल , प्रफुल गुजर , दत्ता जाधव , गौरव साळवी , शैलेंद्र जाधव , आषाढी वारीमधील वारकरी अशोक इदाते , विठ्ठल कासुर्डे , दत्तात्रय खट्याळ , प्रकाश करंजेकर , नाना कदम , आत्माराम चव्हाण व महिला वारकरी सहभागी झाले होते .
यावेळी अमानुल्ला खान यांनी सांगितले की , साधू संत येती दारा तोच ईद , दिवाळी , दसरा आता असे म्हटले पाहिजे , अनेक वर्षांपासून वारकरी हा आपल्या विठुरायाच्या दर्शनाला जातात , त्यांना चालण्याची ताकद हा देवच देतो , त्याचप्रकारे रमजान महिन्यात आम्ही दिवसभर उपवास पकडतो सायंकाळी तो उपवास सोडतो अशा प्रकारे ईश्वराची आपण भक्त होतो व आपणास ही भक्ती जगण्याची ताकद बनते .
यावेळी एका वारकरी बांधवाने सांगितले की , आपण एके वर्षी रमजानचे उपवास धरले होते , आणि खरोखर प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले .